शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या", दौंडमध्ये शहराध्यक्षाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:08 IST

भोंग्याच्या या वादामुळे मनसेचे काही पदाधिकारी नाराज

पुणे : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला आहे. भोंग्याच्या या वादामुळे मनसेचे काही पदाधिकारी नाराज असल्याचे दिसू लागले आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईमध्येही राजीनामा सत्र सुरु झाले. आता औरंगाबादच्या सभेनंतर दौंडमधील जमीर सय्यद यांनी मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने राजीनामा देत आल्याचे त्यांनी पत्रात संगितले आहे. 

''मी जमीर सिकंदर सय्यद राहणार गांधी चौक, दौंड येथील रहिवासी असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर अध्यक्ष म्ह्णून गेली ३ वर्षे कार्यरत आहे. परंतु मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. सुधीर पाटसकर यांनी माझा राजीनामा मंजूर करावा ही नम्र विनंती. असे सय्यद यांनी पत्रात नमूद केले आहे.'' 

भोंगे काढले नाहीत तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू 

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रबोधनकार ठाकरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विविध मुद्द्द्यांवरून त्यांनी पवारांना खडेबोल सुनावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. रमजान ईदपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. परंतु त्यानंतर जर मशीदवरून भोंगे काढले नाहीत. तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज यांनी सगळ्यांना दिला आहे. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेdaund-acदौंडMuslimमुस्लीमPoliticsराजकारण