शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

Raj Thackeray: '...अन् तेच लोक घरी जाऊन 'बिग बॉस' बघतात'; राज ठाकरेंच्या विधानानं सभागृहात पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 20:54 IST

पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले.

पुणे- 

पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले. यात राज ठाकरे यांनी तरुणांनी राजकारणात यायला हवं आणि राजकारण कसं प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे यावर आपले विचार मांडले. तसंच नवं काहीतरी करु पाहणाऱ्यांनी राजकारणात यायला हवं, तरच राजकारणातील वातावरण बदलेल असं म्हटलं. राजकारण वाईट नाही, पण आता ते नासवलं जात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 

"मी त्यांना राजकारणात आणणारच...", राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं, मनसे अध्यक्षांना कुणाची भुरळ?

राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांनाही दिलखुलासपणे उत्तरं दिली. यात एका महिलेनं राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत गृहिणींनाही राजकारणात यावसं वाटतं. पण त्यांच्यासाठी छोट्या पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन दिले तर बरं होईल असं विचारलं. त्यावर राज ठाकरे यांनी संबंधितांना तुमची नावं आणि मोबाइल क्रमांक लिहून आयोजकांकडे द्या, मी तुमच्याशी बोलेन असं आश्वासन दिलं. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. 

...अन् तेच लोक घरी जाऊन 'बिग बॉस' बघताततुमची भाषणं ऐकून मराठी माणूस प्रेरित होतो. पण त्या भाषणापुरताच असतो. घरी गेला की नॉर्मल होतो, असं त्याच महिलेनं राज ठाकरे यांना म्हटलं. त्यावर राज ठाकरे यांनी हजरजबाबीपणे 'हो...घरी जाऊन बिग बॉस बघत बसतो', असं उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नव्हेराजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असं राज ठाकरे म्हणाले. 

विधानसभेतील चर्चा ऐकवत नाहीत राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे