शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Raj Thackeray: '...अन् तेच लोक घरी जाऊन 'बिग बॉस' बघतात'; राज ठाकरेंच्या विधानानं सभागृहात पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 20:54 IST

पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले.

पुणे- 

पुण्यात आयोजित सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले विचार मांडले. यात राज ठाकरे यांनी तरुणांनी राजकारणात यायला हवं आणि राजकारण कसं प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे यावर आपले विचार मांडले. तसंच नवं काहीतरी करु पाहणाऱ्यांनी राजकारणात यायला हवं, तरच राजकारणातील वातावरण बदलेल असं म्हटलं. राजकारण वाईट नाही, पण आता ते नासवलं जात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 

"मी त्यांना राजकारणात आणणारच...", राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं, मनसे अध्यक्षांना कुणाची भुरळ?

राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांनाही दिलखुलासपणे उत्तरं दिली. यात एका महिलेनं राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत गृहिणींनाही राजकारणात यावसं वाटतं. पण त्यांच्यासाठी छोट्या पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन दिले तर बरं होईल असं विचारलं. त्यावर राज ठाकरे यांनी संबंधितांना तुमची नावं आणि मोबाइल क्रमांक लिहून आयोजकांकडे द्या, मी तुमच्याशी बोलेन असं आश्वासन दिलं. त्यानंतर प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं राज ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. 

...अन् तेच लोक घरी जाऊन 'बिग बॉस' बघताततुमची भाषणं ऐकून मराठी माणूस प्रेरित होतो. पण त्या भाषणापुरताच असतो. घरी गेला की नॉर्मल होतो, असं त्याच महिलेनं राज ठाकरे यांना म्हटलं. त्यावर राज ठाकरे यांनी हजरजबाबीपणे 'हो...घरी जाऊन बिग बॉस बघत बसतो', असं उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नव्हेराजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असं राज ठाकरे म्हणाले. 

विधानसभेतील चर्चा ऐकवत नाहीत राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे