शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 18:21 IST

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती.

पुणे - मी १९८९ साली सक्रीय राजकारणात आलो. राज्यात फिरलो, अनेक गावागावात फिरलो. सगळ्या ठिकाणी मला दुरावस्था दिसली ती स्वच्छतेची, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गावागावातील स्वच्छता आणि ग्रामंचायतीच्या कारभारावर भाष्य केलं. पुण्यात मनसेचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी, एका ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचा उल्लेख करताना, राज ठाकरेंनी शोले पिच्चरची आठवण सांगितली.   

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. गावात एक टाकी होती. माझ्या शालेय जीवनात मी अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत पाहिली ती म्हणजे रामगडची, माहितीय ना रामगड असे म्हणत उपस्थितांना प्रश्नही केला. त्यानंतर, शोले सिनेमातील रामगड असे राज यांनी म्हटले. त्या गावातील प्रमुख, सर्वात श्रीमंत ठाकूर त्याच्या घरात लाईट नाही. त्या गावात गेल्यावर रामगडची टाकी आठवली. कारण ठाकूरच्या घरात लाईट नाही, मग त्या टाकीत पाणी कुठून नेणार आहे?, असा मिश्कील टोला राज यांनी लगावला. तसेच, हे चित्र तुम्हाला बदलायचे आहे, असे आवाहनही उपस्थितांना केले.  

तुमचे गाव तुम्ही चांगले ठेवा. गावचे वातावरण बदला. गावातील माताभगिनी महिला त्यांना राहावसे वाटले पाहिजे. तुम्हाला गावात बोलवावं वाटलं पाहिजे असं वातावरण करा. ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांचीही कामे करा. कुणावरही सूड उगवू नका. जर तुम्ही वातावरण चांगले केले तर त्या गावातून तुम्हाला कुणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलू शकत नाही असं राज ठाकरेंनी सांगितले. 

राज ठाकरे देणार ५ लाखांचे बक्षीस

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल त्यातील जी सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल तिथे मी स्वत: येऊन ग्रामपंचायतीसाठी ५ लाखांचा निधी देईन. इतरांसारखी फक्त घोषणा करत नाही. जे तुमच्या आवाक्यात असेल त्या सर्व गोष्टी करा. लोकांचे मतरुपी आशीर्वाद मिळालेत त्यामुळे चांगले काम कायम तुमच्या हातून घडलं पाहिजे. लोकांना समाधानी ठेवा. तुम्ही इतक्या लांबून इथं आलात मला दर्शन दिले त्याबद्दल तुमचे आभारी आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 

२२ तारखेला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय...  

२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होतंय म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे लोकांना त्रास न होता महाआरती करा, पूजा करावी असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईCorruptionभ्रष्टाचारgram panchayatग्राम पंचायत