शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 14:03 IST

शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणीकरिता १९७० पासून दिली जाणारी ४० टक्के कर सवलत महापालिकेने रद्द केली

पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणीकरिता १९७० पासून दिली जाणारी ४० टक्के कर सवलत महापालिकेने रद्द केली आहे. तसेच २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा ४० टक्के सवलतीचा फरक भरण्यासाठी तब्बल ९५ हजार पुणेकरांना नोटिसा बजावल्या आहेत. पुणेकरांवर लादलेल्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ठाकरे यांनी पुणेकरांना दिलासा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी विनंती केली आहे.

याबाबत शासनाने महापालिकेस २०११ मध्ये एक पत्र पाठवत हा निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, वेळोवेळी राजकीय दबावापोटी हा निर्णय घेण्याचे टाळण्यात आले. तसेच शासनाच्या आदेशाबाबत संभ्रम निर्माण करून अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. १९७० चा ठराव राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ रोजी विखंडित केला. खरेतर, हा ठराव पूर्णपणे विखंडित करण्याची आवश्यकताच नव्हती. कारण ४० टक्के जी घरभाड्यानुसार करात सूट देण्यात येत होती त्याबाबत महालेखापाल किंवा स्थानिक निधी लेखापरीक्षण यांच्या अहवालात २०१८ पर्यंत आक्षेप घेण्यात आलेले नव्हते.

याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात पुणे मनपाच्या नुकसानीस जबाबदार म्हणून २०१० नंतरच्या आयुक्तांवर कारवाई करावी. २०१०-११ पासून लोकांकडून अतिरिक्त ५ टक्के कराची वसुली करावी. २०१९ पासूनची ४० टक्के सवलतीची वसुली करावी, असा निर्णय राज्य सरकारने केला. ही रक्कम शेकडो कोटी रुपये असणार आहे. त्यात पुणेकरांचा काय दोष? एकदम ४० वर्षांनी एखादा ठराव रद्द होतो आणि तो रद्द होण्याच्या आधीपासूनचा वसुलीचा आदेश येतो, हा आदेश देण्यामागचा तर्क तरी नक्की काय, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

वसुलीला तात्पुरती स्थगिती

तत्कालीन मनपा आयुक्तांनी पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्यास आणि २०१० नंतरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याबाबत मान्यता मिळावी म्हणून राज्य सरकारकडे ९ मार्च २०२१ रोजी प्रस्ताव पाठवला. त्यावर राज्य शासनाने मान्यताही दिली. सध्या या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. अजून लाखो पुणेकरांना अशा नोटिसा येणे बाकी आहे. त्यापूर्वीच याबाबतचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेणे गरजेचे असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSocialसामाजिकPoliticsराजकारण