शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पुण्यात राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेगा बैठकीत ठरला 'मास्टर प्लॅन' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:35 IST

मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे.

प्राची कुलकर्णी -

पुणे : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने आपला मोर्चा वळविला आहे. त्याच धर्तीवर राज ठाकरे शुक्रवारी (दि. ५ ) सकाळी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये पाहायला मिळाले. आत्तापासूनच त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीत लक्ष घालत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये मनसे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात शहरातील पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. यावेळी मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे. 

दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा सेनेच्या सुरुवातीच्या धोरणांचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक मतदार यादीसाठी राजदूत नेमत त्यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त मतदारांपर्यॅत पोहोचायचं टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सध्याचा परिस्थितीचा आढावा घेतानाच निवडुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौरा करणार आहेत. पक्ष पुन्हा हिंदुत्वाच्या मार्गाने जात असतानाच भाजप मनसे युतीची चर्चाही सुरु झाली आहे. पण महापालिका निवडणुकांसाठी युती केल्यास पुण्यात पक्षाला फटका बसेल असं सांगत मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकार्यांनी मात्र एकला चलो रे चं धोरण स्विकारायची विनंती पक्षाध्यक्षांना केली आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितलं  “ भाजपची महापालिकेचा एकहाती सत्ता आहे. त्यांच्याबरोबर गेल्यास आमच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणून स्वतंत्र लढावे अशी भूमिका आम्ही मांडली आहे. पण याचा निर्णय मात्र अगदी निवडणुकी आधीच्या शेवटच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.” 

दरम्यान, मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाचा मात्र स्विकारतानाच सेनेच्या शाखांच्या धर्तीवर राज-दूतांची नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. भाजपच्या पन्नाप्रमुखांप्रमाणेच हे राजदूत काम करतील. दर आठशे लोकांमागे नेमलेल्या या राजदूतांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यॅत पोहोचायचा प्रयत्न करायचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. तसंच लवकरच या राजदूतांची नेमणुक पुर्ण करुन त्यांच्यासाठी एक शिबीर घेण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले. 

या बैठकीत मनसे पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्यामुळे आनंदी असल्याचे सांगत आपल्यालाही अयोध्येला येऊ द्यावे ही विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूकMNSमनसे