शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 03:43 IST

तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. 

पुणे, दि.31 -  तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. त्यातील काही ढगांची उंची ही ९ किलोमीटरपर्यंत गेली होती़.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘२७ आॅगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते २८ आॅगस्टला छत्तीसगडला आले. २९ आॅगस्टला मध्य प्रदेशाच्या पुढे आले. त्याच वेळी अरबी समुद्रातून दुस-यांदा अतितीव्र स्वरूपाची ढगनिर्मिती होत होती़. याचा परिणाम होऊन मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली़ काही ढगांची उंची ही ९ किमीपर्यंत होती़ पण, चक्रीवादळात, गडगडाटासह वादळी पावसाच्या काळात ढगांची उंची १२ ते १४ किमी असते़’’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘‘मुंबईपासून ५० किमी अंतरावर समुद्रात या ढगांची निर्मिती झाली़ जमिनीपासून साधारण १ कि. मी.वर ढग सुरू होतात. तेथून पुढे त्यांची उंची १२ किमी होती़ काही ढग हे ८ ते ९ किमी उंचीचे होते़ यात सातत्य असल्याने केवळ मुंबईच नाही तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला़ सर्वसाधारणपणे ढगांची उंची ही ८ किमीपर्यंत गेल्यानंतर त्यात वीज व गारांची निर्मिती होती. त्यामुळे या ढगांमधून समुद्रात वीज पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्याची नोंद मुंबईतील रडारवर नोंदविली गेली आहे.’’२००५च्या तुलनेत एकतृतीयांश पाऊस...डॉ. कुलकर्णी यांनी २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाचाही अभ्यास केला होता़ याबाबत त्या वेळी ढगांची निर्मिती मुंबईच्या जवळ झाली होती; त्यामुळे समुद्रात पडणारा पाऊस कमी झाला व तो सर्व मुंबईमध्ये झाला़ २००५मध्ये ढग निर्माण होण्याची प्रक्रिया ही दिवसभर सुरू होती़. त्यामुळे तेव्हा ९४४ मिमी पाऊस झाला होता़ तेव्हाच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस हा ३० टक्केच आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार