शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

Railways New Decision: प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुण्यात उभारले आयटी सेल; २४ तास कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 18:17 IST

मध्य रेल्वेत पहिल्यांदाच अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली असून ती पुण्यातल्या घोरपडी शेड येथून काम करणार आहे.

प्रसाद कानडे

पुणे : भारतीय रेल्वेने प्रवासाभिमुख होण्याचे धोरण स्वीकारले आहे. प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करतानाच त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यासाठी रेल्वेने चोवीत तास कार्यरत राहणाऱ्या आयटी सेलची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेत पहिल्यांदाच अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली असून ती पुण्यातल्या घोरपडी शेड येथून काम करणार आहे.

रेल्वे प्रवासात प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी डबे अस्वच्छ असतात. कधी शौचालयात असह्य दुर्गंधी असते. कधी डब्यात समाजविघातक प्रवृत्ती सहप्रवाशांना त्रास देतात. अशा कोणत्याही तक्रारींसंदर्भात ऑनलाइन तक्रार केल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा निपटारा केला जात असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. आता या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. प्रवाशांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी, त्यांच्या तक्रारींवर चोवीस तास काम केले जाणार आहे. याचा डेटा तयार करून उपाययोजना आखण्याचे काम आयटी सेल करणार आहे. पुणे विभागातील वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयकुमार दडस यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

घोरपडी डिझेल शेडमध्ये उभारण्यात आलेल्या या आयटी सेलचे उद्घाटन मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतेच केले. पुण्यातील आयटी सेलमधूनच मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर व पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे कोचसंदर्भात तक्रारीचे स्वरूप जाणून घेतले जाईल. यासाठी प्रत्येक विभागात लवकरच स्वतंत्र यंत्रणा उभारली जात आहे.

पुण्यातून रोज सरासरी ६ तक्रारी 

पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्यातून रोज सुमारे ६ तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येतात. डब्यांत पाणी नसणे, शौचालय तुंबणे, डब्यांत अस्वछता, पाण्याच्या टाकीतून पाणी गळणे, खिडक्या नादुरुस्त, विद्युत उपकरणे बंद अशा स्वरुपाच्या या तक्रारी प्रामुख्याने आहेत.

डब्यांची देखभाल दुरुस्ती

दर सोळा महिन्यांनी डबे आयओएच (इंटर मीडिएट ओव्हरऑयलिंग) साठी पाठवले जातात. यात डब्यांची दुरुस्ती केली जाते. याचे देखील रेकॉर्ड आयटी सेल ठेवणार आहे. धावत्या रेल्वेतील एखादा डबा अचानक नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणांचा येथे अभ्यास केला जाणार आहे.

“पुण्यात मध्य रेल्वेचा पहिला आयटी सेल सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारी, अडचणींचा शोध घेऊन त्याचा अभ्यास करणे यात अपेक्षित आहे. वारंवार उद्भवणाऱ्या अडचणींवर कायमस्वरुपी उपाय शोधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे असे मध्य रेल्वे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले आहे.'' 

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनGovernmentसरकारPuneपुणे