शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:19 IST

एक जुलैपासून दोन गाड्यांचा भिगवण थांबा रद्द : रेल्वे विभागाचा निर्णय

ठळक मुद्देप्रवासी संघ आणि परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण निवेदनाच्या प्रती खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व महाप्रबंधक यांना दिल्या

भिगवण : चाळीस वर्षांपासून अविरतपणे भिगवणरेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचा थांबा येत्या १ जुलैपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यावर भिगवण परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा रेले रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भिगवण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी संघाची दुगार्माता मंदिरात बैठक झाली. त्यानंतर विविध मागण्यांबाबतचे निवेदन विभागीय रेल्वे प्रबंधक यांना दिले. या वेळी चोपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, की ४० वर्षांपासून हैदराबाद, मुंबई आणि मुंबई चिनी या गाड्यांचा थांबा भिगवण येथे आहे. या दोन गाड्यांच्या थांब्यामुळे भिगवण आणि परिसरातील ४० गावांतील नागरिक आणि प्रवासी आपल्या कामासाठी या गाड्यांचा उपयोग करत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रवाशांना अंधारात ठेवून रेल्वे विभागाने गावांचा थांबा रद्द करण्याचा घाट घातला आहे. 

हा थांबा रद्द झाल्यास अनेक प्रवाशांना त्यांच्या शासकीय कामकाज, उपचार आणि नोकरीधंद्यासाठी पुणे आणि मुंबई तसेच राज्यातील अनेक शहरांना जाण्याचा पर्याय बंद होणार आहे...........भिगवण शहराची तालुक्याच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून ओळख बनत असताना थांबा बंद झाल्यास अन्यायकारक होईल. त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने आपला निर्णय बदलावा, नाही तर रेल रोकोसारख्या तीव्र आंदोलनाला सुरुवात करावी लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले..........तसेच, प्रवासी मंडळ गेले अनेक वर्षे मागणी करीत असलेल्या दोन गाड्यांच्या वाढीव थांब्याचा तातडीने विचार करावा, असे निवेदन या वेळी देण्यात आले.

१ जुलैपासून हा थांबा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रवासी संघाला मिळाली. त्यामुळे प्रवासी संघ आणि परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व महाप्रबंधक यांना देण्यात आल्या. तर, यावर तातडीने निर्णय न झाल्यास याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ................पुणे-दौंड प्रवासी चाकरमान्यांची गैरसोयसकाळी अनेक चाकरमाने आपल्या नोकरीसाठी या रेल्वेगाडीने पुण्याला जातात, तर संध्याकाळी याच गाडीचा वापर करून परतत असतात. तर, व्यापारी वर्गासाठी पर्वणी असणाऱ्या या गाडीचा थांबा बंद झाल्यास अनेक समस्या निर्माण होणार असून पुणे-सोलापूर महामार्गावर त्याचा ताण वाढेल. यामुळे रस्ते अपघातात वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Bhigwanभिगवणrailwayरेल्वेpassengerप्रवासीSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार