शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मुंबईतील मुसळधार पावसामुळे एसटी, रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:20 IST

पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस गाडी रद्द

पुणे : मुंबईत सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुणे व मुंबई दरम्यान एसटीच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण मुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तर बहुतेक गाड्या तब्बल तीन ते चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवारी सकाळपासूनच दोन्ही बाजुच्या बस विलंबाने धावत होत्या. पावसाचा जोर वाढून पाणी साठण्याचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक बस उशिरा धावत होती. दुपारनंतर वाहतुकीवर आणखी परिणाम झाल्याने काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तसेच पावसामुळे प्रवाशांनाही पाठ फिरविली. परिणामी एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईसाठी प्रामुख्याने स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकातून बस सोडल्या जातात. शिवाजीनगर स्थानकातून दररोज १०० फेऱ्या होतात. त्यापैकी सुमारे ३० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. स्वारगेटमधील बसेसचीही जवळपास हीच स्थिती होती. मंगळवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बस विलंबाने धावल्या तर काही फेऱ्या रद्द करून आवश्यकतेनुसार बस सोडण्यात येतील, असेही एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.-------------------------इंद्रायणी एक्सप्रेस रद्दमुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ९) पुण्यातून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. इंद्रायणी एक्सप्रेस वगळता या मार्गावर धावणारी एकही गाडी रद्द करण्यात आली नाही. मात्र, पावसामुळे बहुतेक गाड्या विलंबाने धावत होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेलऐवजी दौंड-मनमाड मार्गाने वळविण्यात आली. हवामान विभागाने मुंबईत आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.-----

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊसrailwayरेल्वे