शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील पुलाबाबत राहुल गांधींची राजकारण न करण्याची भूमिका - जयंत पाटील

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 3, 2022 16:06 IST

दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक हीच खरी सभ्यता

पुणे : पश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यावर त्याचे राजकारण करणारे देशाचे नेतृत्व त्यांच्याच गुजरातमध्ये पडलेल्या पुलाबाबत सोयीस्कर मौन बाळगतात. एवढेच नव्हे तर गुजरात पूल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे त्याविषयावर राजकारण न करण्याची भूमिका राहुल गांधी घेतात, हा दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक आहे. हीच खरी सभ्यता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. पुरंदर पब्लिसिटीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आयुष्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते गुरूवारी पुण्यात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, राजकारणात सभ्यता राहिली नाही. पूर्वी असे होत नसे. कोणीही कोणाच्या कामात अडथळा आणत नसत. पण आज भाजपकडून कशावरही टीका होते. कलकत्ता येथे मागे एक पूल पडला होता. तेव्हा ममता ब‘नर्जी यांच्याविराधात भाजपच्या नेत्यांनी भयंकर टीका केली. तेव्हा हे अपेक्षित नव्हते. आता गुजरातमध्ये पूल पडला. तेव्हा मात्र विरोधक म्हणून राहुल गांधी यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले मी पूल पडण्यावर काही बोलणार नाही. ही खरी सभ्यता आहे.  

ते अळमटळम करणारे नव्हेत 

अळमटळम करणारे नेते हे अजितदादा नाहीत. ते काम होणार असेल तर हो बोलतात. एक घाव दोन तुकडे करतात. त्यांनी जलसंपदामंत्री असताना प्रचंड काम केले. पण त्यांच्यावर घोटाळा झाल्याची टीका केली. सिंचनामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आली. त्यावर कोणी बोलत नाही, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केलं.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणSocialसामाजिक