शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 16:43 IST

देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले

पुणे : मी अनेक जयपराजय पाहिले आहेत. पण जिंकल्यावर अहंकार येतो. राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले आहेत. जनतेने मोदींच्या कामावर मोहोर लावली आहे. म्हणून तर मोदी विजयी झाले. आपल्या २४० जागा आल्या.  अजून थोडी कसर राहिली आहे, आता ती भरून काढू. विधानसभेला पुन्हा भगवा फडकावू.  देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीमधील क्रीडा संकुलात रविवारी (दि.२१) पार पडले. त्यामध्ये अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, सरचिटणीस विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पियूष गोयल, आशिष शेलार, अश्विनी वैष्णव, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे

साठ वर्षानंतर पहिल्यांदा एका नेत्याला तिसर्यांदा पंतप्रधानपदावर मोदींची बनले आहेत. आता विधानसभेमध्येही विजय मिळवायचा आहे. मला कार्यकर्ते भेटत आहेत. पण साशंकता आहे. विरोधकांनी इथे काही संभ्रम निर्माण केला आहे. आपले ध्येय सर्वोच्च असायला हवे. जो विजयी होतो, त्याचेच सरकार बनते. भारतात आपले सरकार बनले आहे आणि आपण विजयी झालो आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

संविधान दिन आम्ही सुरू केला 

राहुलबाबा खटाखट वर भरोसा केला नाही. राज्य सरकार आहेत. तिथे खटाखट पैसे पाठवून द्या ना. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल बहिणींना आवाहन करतो अशी योजना मागा. आम्ही महाराष्ट्रात अनेक कामे केली. समृद्दी राजमार्ग, अटल सेतू, मेट्रो, जलयुक्त शिवार आदी कामे केली. २०१४-१९ चा कार्यकाळ हा विकासाचा होता. आम्ही गरीबांचा, आदिवासींचा विचार करतो. आंबेडकर यांचा अपमान काॅग्रेसने केला तेवढा इंग्रजांनी देखील केला नाही. आंबेडकारंना भारतरत्न नाही दिला. संविधान दिन आम्ही सुरू केला असल्याचे शहा यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAmit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस