हायड्रोजन आधारित ऊर्जेमुळे जगात आमूलाग्र बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:55+5:302021-02-05T05:20:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हायड्रोजन आधारित ऊर्जा उपकरणांमुळे भारतातील नागरी आणि ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होईल, असे प्रतिपादन ...

हायड्रोजन आधारित ऊर्जेमुळे जगात आमूलाग्र बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हायड्रोजन आधारित ऊर्जा उपकरणांमुळे भारतातील नागरी आणि ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होईल, असे प्रतिपादन जर्मनीचे काउन्सल जनरल जर्जन मोऱ्हार्द यांनी नुकतेच येथे केले. एचटूई पॉवर सिस्टीम या कंपनीच्या औपचारिक उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
उद्योजक सिध्दार्थ मयूर यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे फ्युएल सेल, हायड्रोजन जनरेटर, सॉल्ट बॅटरी यांचे उत्पादन या प्रकल्पात सुरू केले आहे.
मोऱ्हार्द म्हणाले, हायड्रोजन ऊर्जेसाठी भारत एक्सपोर्ट हब बनू शकतो. २०३५ पर्यंत जगात हायड्रोजनच्या वापराचे प्रमाण हे ३० ते ४० टक्के इतके होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठा वाव आहे. वाहने आणि औद्योगिक क्षेत्रात हायड्रोजनला खूप मोठा वाव आहे. स्वच्छ, हरीत आणि खात्रीलायक अशी ही ऊर्जा असणार आहे. त्यामुळे पृथ्वीचा वातावरण समतोल टिकण्यास मदत होणार आहे.
मयूर म्हणाले, जगातील मोठ्या प्रकल्पापैकी एक असा आमचा हा प्रकल्प लवकरच मांजरीजवळ आकारास येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.
फोटो : एचटूई पॉवर सिस्टीम या कंपनीच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी जर्मनीचे काउन्सल जनरल जर्जन मोऱ्हार्द, उद्योजक सिध्दार्थ मयूर व इतर.