शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:07 IST

आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे : डॉ. बाबा आढाव

ठळक मुद्देवर्षा गुप्ते यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारचळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे

पुणे : समानता हे समाजवादाचे मुख्य सूत्र आहे. समाजातील वंचितांच्या मार्गातील अडथळे दूर करुन त्यांना प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. आपल्या देशात आजही जातीय विषमतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली ही विषमता दूर करणे हे मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. चळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करून आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञान फाऊंडेशनतर्फे पहिला लोकनेते भाई वैद्य स्मृती कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेत्या वर्षा गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आढाव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिन शिंदे आणि अर्चना मुंद्रा उपस्थित होते.  आढाव म्हणाले, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे. शोषणाची जाणीव ही शोषणाविरूद्ध लढण्याची पहिली पायरी असते. समाजाची प्रगती ही त्या समाजातील चिंतनशीलता आणि कलात्मक सृजनशीलता यांच्यातून प्रतीत होत असते. भारतीय विचार देशवासीयांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपवत नेणे गरजेचे आहे.  डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, जातीअंताचे स्वप्न, सार्वभौमत्व आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे शिक्के मारून पुरोगाम्यांना डांबण्याचे षडयंत्र देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रशासकीय यंत्रणा भेदून टाकण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून त्यादृष्टीने सुरू असलेली वाटचाल फारच दुर्दैैवी आहे.गुप्ते म्हणाल्या, आजपर्यंत केवळ काम हाच पुरस्कार मानून मी माझ्या मार्गावर कार्यरत राहिले. भाईंच्या विचारांच्या शिदोरीने एका सर्वसामान्य स्त्रीचे रुपांतर कार्यकर्तीमध्ये झाले. समाजवादी विचारांनी माज्या जीवनाला दिलेली दिशा सार्थकी लागण्यासाठी शेवटपर्यंत मी या मार्गावर कार्यरत राहणार आहे.  यावेळी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले झोपडपट्टीतील विद्यार्थी अनिकेत पिल्ले,अनिकेत तिंडे, रागिणी गंगावणे, मुस्कान शेख आणि सूरज खांदवे यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञान फाऊंडेशनचे विश्वस्त दिपक ढमाले यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेBhai Vaidyaभाई वैद्यBaba Adhavबाबा आढाव