शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:07 IST

आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे : डॉ. बाबा आढाव

ठळक मुद्देवर्षा गुप्ते यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारचळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे

पुणे : समानता हे समाजवादाचे मुख्य सूत्र आहे. समाजातील वंचितांच्या मार्गातील अडथळे दूर करुन त्यांना प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. आपल्या देशात आजही जातीय विषमतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली ही विषमता दूर करणे हे मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. चळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करून आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञान फाऊंडेशनतर्फे पहिला लोकनेते भाई वैद्य स्मृती कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेत्या वर्षा गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आढाव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिन शिंदे आणि अर्चना मुंद्रा उपस्थित होते.  आढाव म्हणाले, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे. शोषणाची जाणीव ही शोषणाविरूद्ध लढण्याची पहिली पायरी असते. समाजाची प्रगती ही त्या समाजातील चिंतनशीलता आणि कलात्मक सृजनशीलता यांच्यातून प्रतीत होत असते. भारतीय विचार देशवासीयांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपवत नेणे गरजेचे आहे.  डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, जातीअंताचे स्वप्न, सार्वभौमत्व आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे शिक्के मारून पुरोगाम्यांना डांबण्याचे षडयंत्र देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रशासकीय यंत्रणा भेदून टाकण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून त्यादृष्टीने सुरू असलेली वाटचाल फारच दुर्दैैवी आहे.गुप्ते म्हणाल्या, आजपर्यंत केवळ काम हाच पुरस्कार मानून मी माझ्या मार्गावर कार्यरत राहिले. भाईंच्या विचारांच्या शिदोरीने एका सर्वसामान्य स्त्रीचे रुपांतर कार्यकर्तीमध्ये झाले. समाजवादी विचारांनी माज्या जीवनाला दिलेली दिशा सार्थकी लागण्यासाठी शेवटपर्यंत मी या मार्गावर कार्यरत राहणार आहे.  यावेळी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले झोपडपट्टीतील विद्यार्थी अनिकेत पिल्ले,अनिकेत तिंडे, रागिणी गंगावणे, मुस्कान शेख आणि सूरज खांदवे यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञान फाऊंडेशनचे विश्वस्त दिपक ढमाले यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेBhai Vaidyaभाई वैद्यBaba Adhavबाबा आढाव