शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:42 IST

चाकूहल्ला प्रकरण

ठळक मुद्दे प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा घेतला निर्णय सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानावर एका तरुणावर व त्याच्या मित्रांवर अनोळखी व्यक्तीने चाकूसारख्या हत्याराने वार केल्याची घटना नुकतीच घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.शाहरुख शेख (वय २३ रा. दापोडी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अनोळखी सायकलस्वार व्यक्तीविरोधात गुन्हा दखल केला आहे. शाहरुख शेख हे त्यांच्या मैत्रिणीसह विद्यापीठाच्या मैदानात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याबरोबर गैरसमजातून भांडण केले. त्यामुळे शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ अझर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यांना बोलवले. परंतु, अनोळखी व्यक्तीने या तिघांवर चाकूसारख्या हत्याराने वार करून त्यांना जखमी केले. पोलिसांकडून या अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. विद्यापीठाचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. फिर्यादी व आरोपी हे सर्व विद्यापीठाबाहेरचे आहेत, असे पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. माळेगावे यांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्याच सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत विद्यापीठात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तसेच पोलिसांकडून सुरक्षा ऑडिट करून संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच, सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली. सद्य:स्थितीत विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक व होमगार्ड नियुक्त केले आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. त्यामुळे विद्यापीठात बेकायदेशीपणे राहून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे...................

सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावेविद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस निर्णय घेतला आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून येणाºया प्रत्येकाची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्याला विद्यापीठात प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठात काही कामानिमित्त येणाºया व्यक्तींची गैरसोय होऊ शकते.परंतु, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर