शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एकबोटे, भिडे यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 16:03 IST

गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही.

पुणे : गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही. या दोघांना राज्य सरकारचे अभय असल्याने त्यांना अटक होईल यावर विश्वास नाही, असे स्पष्ट मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच धर्मा पाटील यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असून जनता त्यांच्यावर कारवाई करेल, असेही पाटील म्हणाले.

राज्य सरकारचे विविध निर्णय तसेच धोरणांवर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीका केली. कोरेगाव भीमा येथील दंगलीवर बोलताना ते म्हणाले, एकबोटे आणि भिडे गुरूजी यांनी दंगल घडवत समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यामुळे सरकार टिकून असल्याने त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा असला तरी सरकार त्यांना अटक करेल, यावर माझा विश्वास नाही. भाजपाकडून फॅसिस्ट प्रवृत्तीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशभरात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे धोक्यात आलेले लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे. धर्मा पाटील यांचा मृत्यू म्हणजे शेतकरी धर्माचा बळी आहे. त्यांच्या मृत्युला सरकारच जबाबदार असून जनताच त्यांना खाली खेचून कारवाई करेल, असेही पाटील यांनी नमुद केले.

राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना पाटील म्हणाले, खासगी कंपन्यांना आणून शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीचा शिक्षणातही शिरकाव होईल. मराठी शाळा बंद करून गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला आमचा कडाडून विरोध राहील. सरकारकडून केवळ अच्छे दिनचे स्वप्न दाखविले गेले. केंद्रीय अर्थसंकल्पातून हेच दिसून आले. ‘चाय कम किटली गरम’ अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका पाटील यांनी केली.

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव