शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

एकबोटे, भिडे यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 16:03 IST

गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही.

पुणे : गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेला जामीन मिळत असेल तर कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांनाही भीती नाही. या दोघांना राज्य सरकारचे अभय असल्याने त्यांना अटक होईल यावर विश्वास नाही, असे स्पष्ट मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच धर्मा पाटील यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असून जनता त्यांच्यावर कारवाई करेल, असेही पाटील म्हणाले.

राज्य सरकारचे विविध निर्णय तसेच धोरणांवर पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीका केली. कोरेगाव भीमा येथील दंगलीवर बोलताना ते म्हणाले, एकबोटे आणि भिडे गुरूजी यांनी दंगल घडवत समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यामुळे सरकार टिकून असल्याने त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा असला तरी सरकार त्यांना अटक करेल, यावर माझा विश्वास नाही. भाजपाकडून फॅसिस्ट प्रवृत्तीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशभरात जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे धोक्यात आलेले लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे. धर्मा पाटील यांचा मृत्यू म्हणजे शेतकरी धर्माचा बळी आहे. त्यांच्या मृत्युला सरकारच जबाबदार असून जनताच त्यांना खाली खेचून कारवाई करेल, असेही पाटील यांनी नमुद केले.

राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना पाटील म्हणाले, खासगी कंपन्यांना आणून शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीचा शिक्षणातही शिरकाव होईल. मराठी शाळा बंद करून गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला आमचा कडाडून विरोध राहील. सरकारकडून केवळ अच्छे दिनचे स्वप्न दाखविले गेले. केंद्रीय अर्थसंकल्पातून हेच दिसून आले. ‘चाय कम किटली गरम’ अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका पाटील यांनी केली.

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव