शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:36 IST

जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देवीज मंडळ अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार : शेतकऱ्यांचा संतप्त सवालदुरुस्तीबाबत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीला करण्यात आली होती विनंती

टाकळी हाजी : जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वीज मंडळ अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शिरूर तालुक्यातील अनेक गावांत १९७२ च्या दरम्यान वीज आली. ४० वर्षे उलटून गेली. यांच्या तारा जुन्या झाल्यामुळे ठिकठिकाणी लोंबत्या आहेत. पोपट गायकवाड शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना लोंबत असलेल्या तारांचा शॉक बसून जागीच गेले. मलठण परिसरात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. याबाबत मलठण ग्रामपंचायतीने विद्युत वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करून विद्युत तारा बदलण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. यापूर्वी शिरूर येथे सहा महिन्यांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिरूर येथे विजेच्या समस्या सोडविण्याबाबत बैठक झाली होती. यामध्ये आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे उपस्थित होते. या वेळी जुन्या झालेल्या तारा, खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केली. त्वरित कामे सुरू केली जातील, हे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. मात्र प्रत्यक्षातही दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.सन १९७१ च्यादरम्यान तालुक्यातील अनेक गावांमधील बाजारपेठांमध्ये विजेची कामे झाली. बाजारपेठा कायम गर्दीची ठिकाणे असतात. तेथील तारांसारख्या तुटत असतात. मात्र तरीसुद्धा अद्याप तारा बदलल्या नाहीत. त्यामुळे शेताबरोबर गावातून जाणारा कधी, कुणाचा बळी जाईल, याचा भरोसा राहिलेला नाही.तालुक्यातील अनेक विद्युत रोहित्रांचे फ्यूज बॉक्स, फ्यूज धोकादायक झाले असून, शेतकरी, वायरमन जीव धोक्यात घालून फ्यूज टाकतात.याबाबत माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की मंत्री बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये दुरुस्तीची कामे करायची, असा निर्णय झाला, मात्र अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्याला जीव गमवावा लागतो, ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, विजेची चुकीची बिले, कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत तो शेतात कष्ट करीत असून, राज्यातील सर्वच भागातील जुन्या तारा, पोल, ट्रान्स्फॉर्मर बॉक्स दुरुस्तीचे काम हाती घेऊन, शेतकऱ्याला सुरक्षित वीज द्यायला पाहिजे.याबाबत शिरूरचे विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड म्हणाले, की ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या बैठकीनंतर तालुक्यातील दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक करून पाठविले असून, ते मंजूर केले. मात्र निधीअभावी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. निधी उपलब्ध झाल्यास त्वरित दुरुस्तीची कामे केली जातील.याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद नरवडे म्हणाले, की दुरुस्तीबाबत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीला विनंती करण्यात आली होती. एकदा आंदोलनसुद्धा करण्यात आले होते.चेअरमन दत्तात्रय गायकवाड, प्रगतिशील शेतकरी आनंदा गायकवाड म्हणाले, की विजेच्या तारा शेतात लोंबकळत असल्यामुळे महिला, पुरुष, मुलांना शेतात जाताना भीती वाटत आहे. काही ठिकाणी तर विद्युत तारा डोक्याला लागतात. त्यामुळे खालून जाणे, तसेच मशागत करणे धोक्याचे झाले आहे.

टॅग्स :ShirurशिरुरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPuneपुणे