आंदर मावळात अंधार टाकवे
By Admin | Updated: May 21, 2014 00:28 IST2014-05-21T00:28:08+5:302014-05-21T00:28:08+5:30
आंदर मावळमध्ये एक महिन्यापासून वादळी वार्यामुळे विजेचे खांब पडल्याने व वीजवाहक तारा तुटल्याने आंदरमावळातील विविध गावांची वीज खंडित झालेली आहे

आंदर मावळात अंधार टाकवे
बुद्रुक : आंदर मावळमध्ये एक महिन्यापासून वादळी वार्यामुळे विजेचे खांब पडल्याने व वीजवाहक तारा तुटल्याने आंदरमावळातील विविध गावांची वीज खंडित झालेली आहे. त्याबाबत वडगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. वीजपुरवठा अद्याप सुरळीत केले जात नाही. आंदरमावळ परिसरामध्ये महाराष्ट्र वितरणचे दोनच कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा जास्त ताण येत असल्याने त्यांच्याकडून पूर्ण आंदरमावळात वीज सुरळीत करणे शक्य होत नाही. मात्र दररोज वडगाव येथील कार्यालयात तक्रारी केल्या असता, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. घरात वीज नसल्याने लवकर जेवण करून बसावे लागते. महिलावर्ग याबाबत जास्त नाराजी व्यक्त करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महावितरण कंपनीने आंदरमावळामध्ये वादळ वार्यामुळे तुटलेल्या वीजवाहक तारांची लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी राजू खांडभोर, यशवंत तुर्डे, जयदास ठाकर, सोमनाथ भोईर, दत्ता मोधळे, माऊली गायकवाड, हनुमंत ठाकर आदींनी केली आहे. (वार्ताहर)