शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईत मिळाला पिकांना आधार, पुरंदर उपसा योजनेचे पाणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:46 IST

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे.

भुलेश्वर - पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळील पडल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईनद्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करून त्या लाईनवरील शेतकºयांना दिलेजाते. या योजनेवर सध्या कांदा, पालेभाज्या, ऊस, टोमॅटो, दोडका, वांगी, फळझाडे इत्यादी पिके अवलंबून आहेत. सध्या या पिकांना पाणी मिळाल्याने वाया जाणारी पिके वाचवण्यात यश आले आहे़पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, यंदा उन्हाळी हंगामातील कमी दराने पाणी सोडण्यात सुरुवात झाली असून शेतकºयांची मागणी वाढत चालली आहे. गावालगतच्या ओढे, नाले यांना पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.पूर्वी पुरंदर तालुका म्हटले की, दुष्काळी परिस्थिती समोर उभी राहते. पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली. व लाभार्थी गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, हे नक्की.पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करताना दुष्काळी पुरंदर तालुक्यात ठिबक सिंचनने पाणी देऊन पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठी डोंगराच्या कडेला पाईप लाईन न करता डोंगराकडील काही भाग सोडून ही लाईन तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने उपसा सिंचन योजना वीजबिलामुळे अडचणीत येऊ नये म्हणून उन्हाळी हंगामात सरकार ८१ % वीजबिलाची रक्कम भरणार असून उर्वरित १९% रक्कम लाभार्थी शेतकºयांना भरावी लागणार आहे. उन्हाळी हंगामात पाण्याचा दर कमी असल्याने ही योजना आता बाराही महिने चालणार आहे. यासाठी लाभार्थी गावातील पाणीसंस्था उभ्या राहणे गरजेचे आहे. यांच्या वरती निमंत्रण व नियोजन करण्यासाठी शिखर संस्था उभी करने गरजेचे आहे. तसे न केल्यास पाणी वाटपात अडचणी येणार आहेत.ऐन उन्हाळ्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची पातळी वाढली आहे. ओढ्यांनी या योजनेचे पाणी सुटल्याने ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहे. जणू काही पावसाळाच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. - शरद गायकवाड,शेवंती उत्पादक शेतकरीअधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर..पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू आहे. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी होत आहे. या योजनेचे सहायक अभियंता श्रेणी १ कामेश पाटील यांच्या आदेशानुसार पहिल्यांदाच या योजनेचे सर्वच अधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाण्याचे नियोजन करत आहे. त्यांच्या अडीअडचणी समजावून सोडवत आहेत यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात सहायक अभियंता सुहास सकपाळ, थापत्य अभियांत्रिकी सहायक अविनाश जगताप, औदुंबर महाडीक, कनिष्ट लिपीक त्रिभुवन कदम, पाणी कामगार किरण आंबले, गणेश आंबले हे ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या शेतात भेटी देत आहेत व अडीअडचणी सोडवताहेत़

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी