शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

टंचाईत मिळाला पिकांना आधार, पुरंदर उपसा योजनेचे पाणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:46 IST

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे.

भुलेश्वर - पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळील पडल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईनद्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करून त्या लाईनवरील शेतकºयांना दिलेजाते. या योजनेवर सध्या कांदा, पालेभाज्या, ऊस, टोमॅटो, दोडका, वांगी, फळझाडे इत्यादी पिके अवलंबून आहेत. सध्या या पिकांना पाणी मिळाल्याने वाया जाणारी पिके वाचवण्यात यश आले आहे़पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, यंदा उन्हाळी हंगामातील कमी दराने पाणी सोडण्यात सुरुवात झाली असून शेतकºयांची मागणी वाढत चालली आहे. गावालगतच्या ओढे, नाले यांना पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.पूर्वी पुरंदर तालुका म्हटले की, दुष्काळी परिस्थिती समोर उभी राहते. पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली. व लाभार्थी गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, हे नक्की.पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करताना दुष्काळी पुरंदर तालुक्यात ठिबक सिंचनने पाणी देऊन पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठी डोंगराच्या कडेला पाईप लाईन न करता डोंगराकडील काही भाग सोडून ही लाईन तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने उपसा सिंचन योजना वीजबिलामुळे अडचणीत येऊ नये म्हणून उन्हाळी हंगामात सरकार ८१ % वीजबिलाची रक्कम भरणार असून उर्वरित १९% रक्कम लाभार्थी शेतकºयांना भरावी लागणार आहे. उन्हाळी हंगामात पाण्याचा दर कमी असल्याने ही योजना आता बाराही महिने चालणार आहे. यासाठी लाभार्थी गावातील पाणीसंस्था उभ्या राहणे गरजेचे आहे. यांच्या वरती निमंत्रण व नियोजन करण्यासाठी शिखर संस्था उभी करने गरजेचे आहे. तसे न केल्यास पाणी वाटपात अडचणी येणार आहेत.ऐन उन्हाळ्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची पातळी वाढली आहे. ओढ्यांनी या योजनेचे पाणी सुटल्याने ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहे. जणू काही पावसाळाच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. - शरद गायकवाड,शेवंती उत्पादक शेतकरीअधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर..पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू आहे. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी होत आहे. या योजनेचे सहायक अभियंता श्रेणी १ कामेश पाटील यांच्या आदेशानुसार पहिल्यांदाच या योजनेचे सर्वच अधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाण्याचे नियोजन करत आहे. त्यांच्या अडीअडचणी समजावून सोडवत आहेत यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात सहायक अभियंता सुहास सकपाळ, थापत्य अभियांत्रिकी सहायक अविनाश जगताप, औदुंबर महाडीक, कनिष्ट लिपीक त्रिभुवन कदम, पाणी कामगार किरण आंबले, गणेश आंबले हे ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या शेतात भेटी देत आहेत व अडीअडचणी सोडवताहेत़

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी