शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

विमानतळाचे काम तीन वर्षांत मार्गी लावू : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:39 IST

जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. 

ठळक मुद्देपुरंदरमध्येच होणार विमानतळ; बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करणार  भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या व जिल्हा आणि शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरणारे पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे स्पष्ट करत येत्या तीन वर्षांत हे काम मार्गी लागेल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे व्यक्त केले. विमानतळाला नागरिकांचा विरोध नसून, शासनाच्या वतीने जास्तीत जास्त चांगल्या पुनर्वसनाची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन म्हणून नागरिकांचे कवडीचे नुकसान न करता सर्वांत चांगले पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सौरभ राव यांनी ही माहिती दिली. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे २७०० ते  २८०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचे भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय बाधित कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा पुनर्वसन धोरणाचा एक भाग असल्याचे राव यांनी सांगितले. संरक्षणाची जबाबदारी हवाई दलाकडे लोहगाव विमानतळावरून रोज ११० प्रवासी विमाने ये-जा करतात. तर संरक्षण विभागाची फक्त ८ विमानांची ये-जा होते. लोहगाव विमानतळावरून ९२ टक्के नागरी उड्डाणे आहेत. तर संरक्षण विभागातील आठ टक्के विमानांचे उड्डाण होते. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईवरील संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरPuneपुणेAirportविमानतळSaurabh Raoसौरभ राव