शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

विमानतळाचे काम तीन वर्षांत मार्गी लावू : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:39 IST

जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. 

ठळक मुद्देपुरंदरमध्येच होणार विमानतळ; बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करणार  भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या व जिल्हा आणि शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरणारे पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे स्पष्ट करत येत्या तीन वर्षांत हे काम मार्गी लागेल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे व्यक्त केले. विमानतळाला नागरिकांचा विरोध नसून, शासनाच्या वतीने जास्तीत जास्त चांगल्या पुनर्वसनाची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन म्हणून नागरिकांचे कवडीचे नुकसान न करता सर्वांत चांगले पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सौरभ राव यांनी ही माहिती दिली. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे २७०० ते  २८०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचे भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय बाधित कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा पुनर्वसन धोरणाचा एक भाग असल्याचे राव यांनी सांगितले. संरक्षणाची जबाबदारी हवाई दलाकडे लोहगाव विमानतळावरून रोज ११० प्रवासी विमाने ये-जा करतात. तर संरक्षण विभागाची फक्त ८ विमानांची ये-जा होते. लोहगाव विमानतळावरून ९२ टक्के नागरी उड्डाणे आहेत. तर संरक्षण विभागातील आठ टक्के विमानांचे उड्डाण होते. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईवरील संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरPuneपुणेAirportविमानतळSaurabh Raoसौरभ राव