शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:11 IST

पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे.

पुणे : शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे. ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेला आदेश तुम्हाला आता पाळावाच लागेल’ असे जलसंपदा विभागाने महापालिकेला गुरुवारी झालेल्या बैठकीत बजावले. ११५० दशलक्ष लिटर पाणीच दररोज मिळणार हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करा असे पालिकेला सांगण्यात आले.सध्या पालिका १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असून, तरीही शहराला पुरेसे पाणी देण्यात अडचणी येत आहेत. आता ११५० दशलक्ष लिटर पाणी मिळाल्यास, संपूर्ण पुणे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ११५० दशलक्ष लिटर पाणी वापरण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय कायम ठेवून त्याप्रमाणे महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून सिंचन भवन येथे गुरुवारी ही बैठक झाली.जलसंपदाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम आदी बैठकीला उपस्थित होते. प्राधिकरणाच्या आदेशावर बैठकीत चर्चा झाली. धरणातील पाण्याचे नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तसेच सरकारने कोटा ठरवून दिला आहे, त्याप्रमाणे महापालिकेने ११५० दशलक्ष लिटर पाणी रोज घेतले पाहिजे; मात्र पालिका दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे असे पालिकेला सांगण्यात आले.यामुळे महापालिकेचीच अडचण होणार आहे. महापालिकेसाठी साडेअकरा टीएमसी वार्षिक पाणी निश्चित केले आहे. ते पालिकेने जपून वापरले पाहिजे. तसे न करता जास्त पाणी वापरले गेले, तर ऐन उन्हाळ्यात धरणामध्ये महापालिकेच्या वाट्याचे पाणी नसेल. शेतीसाठी व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला त्यांचा साठा त्यांना द्यावा लागेल. तरीही नियोजनामध्ये उन्हाळ्यातील दोनऐवजी एकच आवर्तन ठेवण्यात आले आहे.त्यामुळे आता महापालिकेने दररोज ११५० दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन करावे असे जलसंपदाकडून सांगण्यात आले.दिवसाआड पाण्याची येणार वेळ : पाणीकपात करावीच लागणारसध्या मिळणारे १३५० दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला पुरवताना प्रशासनाची अडचण होत आहे. प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे जलसंपदाने ११.५० टीएमसी वार्षिक पाणी देण्यात आले, तर पुणे शहराला दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटरच पाणी मिळेल.हे पाणी पुरवून वापरायचे तर एक दिवसाआड व तेही फक्त थोडाच वेळ, कमी दाबाने द्यावे लागणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुणे शहरावर पाण्याच्या कपातीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.बैठकीत यावर चर्चा झाली, त्या वेळी जलसंपदाने महापालिकेला पाण्यात काही टक्के कपात जाहीर करावी, असे सांगितले; मात्र हा निर्णय पालकमंत्री, महापौर आदी राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनच घ्यावा लागेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.महापालिका सध्या दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. ते पुरवून वापरतानाच महापालिकेची दमछाक होत आहे.शहराच्या काही ठिकाणी पाणी पोहोचतच नाही. विशेषत: पूर्व भागातील उपनगरांना हा त्रास सहन करावा लागतो आहे.मोठ्या सोसायट्यांमध्ये पाण्याला दाब नसल्यामुळे जमिनीखालील साठवण टाक्यांमध्ये पाणी साठत नाही. त्यामुळे ते पाणी इमारतींमध्ये वर चढवता येत नाही. सलग दोन तासही पाणी येत नसल्यामुळे टँकर मागवून त्यांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका