शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

Pune Water News : कालवा समितीच नसल्याने शहराच्या पाण्याबाबतचा निर्णय लांबला

By नितीन चौधरी | Updated: November 27, 2024 19:53 IST

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवले ...

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवले जाईल, याबाबत अद्याप जलसंपदा विभागाकडून निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शहरासाठी पाणी सोडताना खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांमधून तसेच काही प्रमाणात भामा आसखेड धरणातूनही पुण्यासाठी पाणी उचलण्यात येते. महापालिकेच्या नियोजनानुसार शहराला २१ टीएमसी इतक्या पाण्याची गरज असते. यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये सप्टेंबरमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तसेच जिल्ह्यातील अन्य धरणेही फुल्ल झाली होती. खडकवासला प्रकल्पात सध्या २७.२७ टीएमसी (९३.५५ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाण्याच्या टंचाईची स्थिती नाही.खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी १५ ऑक्टोबरला नियोजन करण्यात येते. त्यात शहरासह जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या निर्णयासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते. मात्र, निवडणुकीमुळे ही बैठक होऊ शकली नाही. ही बैठक घेण्यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांशी पत्र व्यवहार केला आहे. मात्र, त्याबाबत सरकारकडून कोणतीही भूमिका अद्याप घेण्यात आली नसल्याचे समजते. पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असते. या बैठकीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. त्या बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याचा फैसला करण्यात येतो. आता राज्यात महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाचे सरकार स्थापन होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाप्रमाणे जलसंपदा विभागाला आहे. त्यामुळे जोपर्यंत ही बैठक होणार नाही तोपर्यंत पाणीवाटपाबाबतचे निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे.शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट गावे यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळेच महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून पाण्याचा वाढीव कोटा देण्याची मागणी जलसंपदा विभागासह राज्य सरकारकडे करीत आहेत. महापालिकेने तर २१ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात महापालिकेचा जलसंपदा विभागाशी झालेल्या करारापोटी ११.६० टीएमसी इतके पाणी देय ठरले होते. परंतु, धरणातून अतिरिक्त पाणी उचलले जात असल्याने १४.६१ टीएमसी पाणीसाठा जलसंपदा विभागाने मंजूर केला होता. महापालिकेने ७६ लाख लोकसंख्या दाखवून त्यासाठी २१ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला दिला आहे. अद्याप त्याला जलसंपदाने मंजुरी दिली नाही. मात्र, राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच त्याचा निर्णय होईल, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रkhadakwasala-acखडकवासला