शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दावे निकाली काढण्यात पुणे पुन्हा अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 13:59 IST

लोकअदालत : एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली

ठळक मुद्देपुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजनदर चार महिन्यांनी या लोकअदालतीचे आयोजन

पुणे : पुणे लोकअदालतीने सर्वाधिक खटले निकाली काढत यंदाच्या वर्षीदेखील पहिले स्थान पटकावले आहे. मुंबई राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्देशाने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या वर्षीदेखील लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. चारही लोकअदालतींमध्ये सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आले. या चारही लोकअदालतींमध्ये पुणे राज्यात पहिले आहे. या लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात यश आले. यापूर्वीच्या लोकअदालतीतदेखील पुण्याने सर्वाधिक खटले निकाली काढून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती.  पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा न्यायालयाचे तत्कालीनप्रमुख न्यायाधीश एस. बी. अग्रवाल, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत आयोजित केली होती.  कोर्टात दाखल असलेले प्रलंबित दावे आणि दाखलपूर्व दावे तडजोडीने आणि परस्परसामंजस्यातून दावे निकाली काढता यावेत म्हणून राज्यात एकाच वेळी एकादिवशी या विशेष उपक्रम लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. दर चार महिन्यांनी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते.  

.............................

रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांना ४ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत तडजोडीअंती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. दावा दाखल झाल्यानंतर पहिल्याच तारखेला हा दावा निकाली निघाला.* २५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोथरूड परिसरात ही घटना घडली. घटनेतील मृत व्यक्ती पौडच्या दिशेने पायी चालली होती, त्या वेळी सिमेंट मिक्स करणाºया ट्रकची तिला जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा बायंडिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबीयांनी अ‍ॅड. उन्मेष देशपांडे यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे रॉयल सुंदरम विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला होता. अ‍ॅड. देशपांडे यांच्याकडून १४ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ४ लाख २५ हजार रुपये देऊन हा दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. ऋषीकेश गानू यांनी काम पाहिले.

.................

 

निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे. नुकतेच १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार ७६० दावे निकाली काढण्यात यश आले होते. या लोकअदालतीत सर्वांधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. या लोकअदालतींमधून दोन अब्ज २२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली.  -  सी. पी. भागवत (सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) ..........लोकअदालत               निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले दावे    निकाली दावे१७ मार्च                                 १,४२,७३८                                              ४४,७०११३ जुलै                                 ९३,६९०                                                  २८,६६६१४ सप्टेंबर                          ८७,९५८                                                   १६,१८३१४ डिसेंबर                          ८९,६३५                                                   २६,७६०महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली विशेष लोकअदालत - ४७४ 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय