शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात

By राजू इनामदार | Updated: March 15, 2025 15:55 IST

देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे.

पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीत जागांवरून वाद झाल्याने आम आदमी पार्टीने (आप) काँग्रेसबरोबर फारकत घेतली. आता पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्यांना काँग्रेसबरोबरच सामना करावा लागणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहे. त्यामुळेच आता ‘आप’ समोर इंडिया आघाडीत रहायचे की जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांचे यासंदर्भातील मत दिल्लीतील पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अजमावून घेतले जात आहे.देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. ‘आप’ नेही इंडिया आघाडीत प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी काँग्रेसपासून दुरावा ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला लांबच ठेवले. त्यामुळे त्यांच्या सत्तेला फटका बसला. काँग्रेस उमेदवारांमुळे आपचे काही उमेदवार पराभूत झाले. पंजाब विधानसभेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. तिथे ‘आप’ सत्ताधारी आहे, तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे तिथेही ‘आप’ला काँग्रेसबरोबरच लढावे लागणार आहे.असे असेल तर इंडिया आघाडीत रहायचे कसे? असा प्रश्न आप चे वेगवेगळ्या राज्यांमधील पदाधिकारी विचारत आहेत. आप च्या केंद्रीय नेतृत्वामध्येही याची चर्चा आहे. इंडिया आघाडीत राहून काँग्रेसचे नेतृत्व मान्य करायचे की इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असा हा प्रश्न आहे. याबाबत पक्षाकडून वेगवेगळ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना विचारणा होत आहे. त्यासाठी केंद्रातील काही पदाधिकारी राज्यांचा दौरा करत आहेत. इंडिया आघाडीबरोबर व स्वतंत्र अस्तित्व यात राजकीय फायद्यातोट्याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की बैठका होत असल्या तरी त्या वेगळ्या कारणांसाठी होत आहेत.आप चे संघटन वाढवण्यावर आता पक्षाने भर दिला आहे. प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युवकांना एकत्र करून पक्षात सामावून घेण्यासंदर्भात चर्चा होत आहेत. महाराष्ट्रातील एकूण राजकीय गोंधळात दिल्लीतील नेतृत्वाला महाराष्ट्राकडून अपेक्षा आहेत. पक्ष बांधणी करण्यास बराच वेळ असल्याने त्यादृष्टिने बैठका होत आहेत असे किर्दत म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आप ने महाराष्ट्रात इंडिया आघाडीला, म्हणजेच महाविकास आघाडीला साथ दिली. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने एकही जागा न मागता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यातून विधानसभा लढवू इच्छिणारे काही कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजून काढण्यासाठीची दिल्लीतील काही पदाधिकारी महाराष्ट्रात येत आहेत अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल