शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच, तीन महिन्यांत ६२ तर वर्षभरात अपघातात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू

By राजू हिंगे | Updated: April 11, 2025 11:41 IST

पुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला

पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ८२६ किलोमीटरचे रस्ते विनापदपथ आहेत. सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर पदपथ असले तरी त्यातील निम्म्याहून अधिक पदपथ अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. या वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या वर्षातील तीन महिन्यात जानेवारीपासून ५९ अपघातांमध्ये ६२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यावरून पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षित बनत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या आठवड्यात उंड्री येथे ४९ वर्षीय सुजितकुमार सिंग मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना कारने धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पादचारी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात सुमारे १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरातील रस्ते हे महापालिकेच्या मालकीचे आहेत. शहरात रस्ते तयार करताना नागरिकांना पायी चालता यावे, तसेच कुठल्याही अडथळ्याविना चालता यावे, यासाठी पदपथ तयार केले. पण, अनेक पदपथावर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अनेक दुकानदार, कार्यालयातील कर्मचारी पदपथावरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. महापालिकेने शहराच्या विविध भागांतील पदपथावर नागरिकांनी दुचाकी वाहने चालवू नयेत. अतिक्रमण करू नये, यासाठी सिमेंटचे ठाेकळे बसविले आहेत. पण, अनेक ठिकाणच्या पदपथावरील सिमेंटचे ठोकळे ताेडण्यात आले आहेत. त्यामुळे पदपथावरून दुचाकीधारक बिनधास्तपणे वाहने चालवतात.वर्षभरात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यूपुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे मृत्यू सर्वात जास्त म्हणजे १९२ आहे. त्या खालाेखाल पादचाऱ्यांचे १२० मृत्यू झाले आहेत. पादचाऱ्यांच्या अपघाताच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०२२ मध्ये अपघातामध्ये पादचाऱ्यांचे १०६ मृत्यू झाले होते. प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनाने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे अधिक अपघात होत आहेत. या वर्षभरात म्हणजे २०२५मध्ये जानेवारीत १२, फेब्रुवारी १५ आणि मार्चमध्ये ३५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पादचारी सिग्नल पाळत नाहीत !शहरातील रस्त्यांवर वाहनाबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिग्नलमध्ये वेळ दिलेला असतो. पण, अपवाद वगळता तो कोणीही पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी तर चौकातील वाहतूक पोलिस पादचाऱ्यांसाठी असलेल्या वेळेत वाहने पुढे जाण्यास सांगतात. वाहनांना पुढे पाठवून चौक मोकळा करण्याकडे वाहतूक पोलिस महत्त्व देताना दिसतात.हे आहेत नियमशहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पदपथ आहेत; पण काही रस्त्यांवर ते तुटक स्वरूपात आहेत. नियमानुसार पदपथाची रुंदी किमान १.८ मीटर आणि रस्त्यापासून १५० मिमी उंच असणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या पातळीनुसार अपवादात्मक परिस्थितीत नियमापेक्षा उंच असल्यास रॅम्प किंवा पादचाऱ्यांची रचना करण्यात येते.पादचारी सुरक्षितता धोरण कागदावरचमहापालिकेने मोठा गाजावाजा करून ‘पादचारी सुरक्षितता धोरण’ आठ वर्षांपूर्वीच तयार केले होते. त्यात शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या धोरणात पादचाऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. पादचाऱ्यांना कमीत कमी वेळेत रस्ता ओलांडता यावा यासाठी पादचारी मार्गाची निर्मिती, प्रमुख रस्त्यांवर पुरेशा जागांची उपलब्धता, अशा बाबी या धोरणात आहे. पादचाऱ्यांसाठी धोरण तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. पण, या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही.

‘पादचारी रस्त्यांवरून चालत असतील तर पदपथाचे डिझाइन कुठेतरी चुकले असणार’ ही खूणगाठ मनाशी बांधून असे पदपथ सुधारले पाहिजेत. पदपथांवर योग्य प्रमाणात, सुनियोजित जागा देऊन, पादचाऱ्यांना सोयीस्कर असलेले पदपथ बनवणे अत्यावश्यक आहे.  - हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड