शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पुणे: लांडेवाडीतील बलात्कार-चोरीप्रकरण व नगर जिल्हयातील कोठेवाडीच्या घटना एकाच प्रकारच्या :नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 20:31 IST

पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्ह्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांची शिष्टमंडळासह पुण्यात भेट घेतली.

पुणे: पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्ह्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांची शिष्टमंडळासह पुण्यात भेट घेतली. या भेटीत लांडेवाडी ता.आंबेगाव येथे घडलेल्या चोरीच्या आणि बलात्कारच्या घटना, धामणे ता खेड येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना तसेच एकवीरादेवी च्या कळस चोरी प्रकरणी आरोपीस अटक करण्यास होत असलेल्या विलंब याकडे लक्ष वेधले. दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी पहाटे मैलवस्ती लांडेवाडी, ता.आंबेगाव येथे चोरट्याने आजारी असेल्या वृध्द महिला भागुबाई ढेरंगे यांच्या घरी चोरी केली. तसेच भागुबाईच्या मदतीस असेल्या महिलेस जखमी करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेतील तीनही आरोपी अद्याप फरार आहेत. याबाबत आ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक यांनी या घटनेचा पूर्विच्या मंचरमधील दरोडा घटनेशी संबध आहे का? या तपासबाबत चर्चा झाली तसेच या घटनेचे साम्य कोठेवाडी घटनेशी असल्याचे आ.गोऱ्हे यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. आ.गोऱ्हे यांनी अशा चोरीच्या घटनेत चोरांकडून लुटण्यात आलेल्या सोने, चांदी व इतर वस्तू विकत घेणाऱ्यांवर जो पर्यंत कडक कार्यवाही होणार नाही तो पर्यंत अशा घटनांना आळा घालणे अवघड असल्याचेही सांगितले. ही चोरी केल्यानंतर आरोपीने इतरत्र सात ठिकणी चोरी केल्याचे उघड झाले आहे. तरी देखील पोलीस प्रशासन कमी पडले असल्याने आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला असून त्वरितआरोपी पकडण्याच्या कारवाईची मागणी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव सर्वात मोठा सज्जा असल्याने याठिकाणी पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. धामणे, ता. खेड येथील घटनेला पाच दिवस झाले तरी सुद्धा आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे कार्ला येथील एकवीरादेवी च्या कळसाची चोरी होऊन महिने झाले तरी देखील आरोपी पर्यंत पोलीस प्रशासनाला पोहोचता आलेले नाही. याबाबत नापसंती व्यक्त केली. पोलिसांकडून एकवीरा देवीच्या घटनेत अटकेत असलेल्या आरोपीची काही तंत्राच्या ऊपयोग करण्याची परवानगी कोर्टाने दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. परंतु याचा उपयोग कितपत आरोपी शोधण्यास होईल हा प्रश्नच आहे,असे सांगून या वरील सर्व घटनेमुळे पुणे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने व या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी पुणें ग्रामिण भागातील वाहतूक यंत्रणेचा बोजवारा ऊडाला असून त्याबाबत त्वरित ऊपाययोजना आवश्यक आहे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.चाकणला एमाआयडिसी भागात स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज गेली १० वर्षे मागणी केली जात असून या अधिवेशनात मा ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे पाठपुरावा यासाठी आ.नीलम गोर्हे प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधिक्षक श्री.सुवेझ हक यांना सांगीतले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड गणेशराव सांडभोर, खेडचे उप तालुका प्रमुख किरण गवारे, उद्योजक अविनाश तापकीर, आळंदीचे उपशहरप्रमुख संदिपराव पगडे, शाखाप्रमुख कैलासभाऊ गोपाळे, युवानेते गणेशराव शेळके उपस्थित होते.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेCrimeगुन्हा