शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत; भूषणसिंह राजे होळकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:51 IST

वाघ्या श्वान प्रकरणाला जातीय रंग देऊ नका; भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे -रायगडावरील वाघ्या श्वानाच्या स्मारकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना भूषणसिंह राजे होळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की,'महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय.  भूषणसिंह राजे होळकर यांनी वाघ्या श्वानाच्या अस्तित्वावर भाष्य करण्यास नकार दिला, मात्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी, अशी मागणी केली. संजय सोनवणी आणि इंद्रजित सावंत यांच्यासारख्या अभ्यासकांना समितीत घ्यावे. जेणेकरून ऐतिहासिक सत्य समोर येईल. असेही ते म्हणाले आहे. त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय हा कोणत्याही एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जातो, हे दुर्दैवी आहे. इतिहासाच्या आधारे सत्य बाहेर यावे आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी शासनाने मध्यस्थी करावी, अशी त्यांनी विनंती केली.    ते पुढे म्हणाले,'होळकरांनी रायगडावरील शिव समाधीसाठी मोठा निधी दिला होता. तुकोजी होळकर यांनी शिवस्मारकासाठी योगदान दिले, त्याच्या स्पष्ट नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे, वाघ्या कुत्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की, होळकरांनी दिलेल्या निधीवरच वाद घातला जात आहे? असा सवाल उपस्थित केला.  संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेवर इशारा भूषणसिंह राजे यांनी संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांना आळा घालण्याची गरज आहे, असे मत मांडले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. त्यामुळे, होळकर इंग्रजांना घाबरत होते असे वक्तव्य करणाऱ्यांचा इतिहास किती खोल आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखलराजकीय अजेंडा चालणार नाहीयेत्या ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या संघटनांना समज द्यावी आणि हा वाद योग्य पद्धतीने सोडवावा,असे त्यांनी म्हटले.  शिवराय आणि अहिल्यादेवींच्या कार्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही त्यांनी सांगितले की, आमच्या घराण्याने शिवरायांसाठी दिलेल्या योगदानाचा योग्य सन्मान व्हावा. तुकोजी होळकर यांच्या स्मरणार्थ रायगडावर फलक लावावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लागू नये, अन्यथा तीव्र विरोध होईल.  मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडणार भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले की, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा संपूर्ण विषय मांडणार आहे. तसेच, ताराराणीच्या समाधीच्या संवर्धनावर भर द्यावा, औरंगाबादच्या कबरीपेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा आहे.  राजकीय हेतूने कोणीही ऐतिहासिक सत्य बदलण्याचा किंवा विकृत करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय स्वरूप दिले जाते, मात्र हा विषय ऐतिहासिक आहे आणि तो तसेच पाहिला जावा. असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज