शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Pune: मिरवणुकीला विलंब हाेण्यास पुणे पाेलिसच जबाबदार, मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:45 IST

परवानगी न दिल्याने थांबावे लागले ताटकळत...

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजताच सहभागी झाले. त्यानंतर अन्य महत्त्वाच्या मंडळांनी मिरवणुकीत सामील होण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांना सहभागी होता आले नाही. परिणामी मिरवणूक लांबत गेली. महत्त्वाची मंडळे लवकर सहभागी झाली असती तर मिरवणूक लवकर संपली असती, असा दावा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लवकर सामील झाल्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान पाच ते सहा तास लवकर संपेल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यानंतर मिरवणुकीत सामील होणाऱ्या महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येण्यास तब्बल सहा तासांचा विलंब झाला आणि अपेक्षेवरच पाणी फिरले.

दरवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत जिलब्या मारुती मंडळ त्यानंतर बेलबाग मित्रमंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळ, अखिल मंडई मंडळ या मंडळानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सहभागी होत असे. त्यामुळे दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीला विसर्जनासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यंतचा वेळ लागत होता. त्यामुळे दगडूशेठ मंडळानंतर सहभागी होणाऱ्या मंडळांना अनेक तास रांगेतच थांबावे लागत होते.

दरम्यान, जिलब्या मारुती मंडळ दुपारी पाच वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयार होते. बेलबाग मित्रमंडळाचा रथही तयार होता. भाऊ रंगारी मित्रमंडळाने रथ बाबू गेनू चौकात आणून ठेवला होता. या चार मंडळांमध्ये शेवटचा असलेला अखिल मंडई मित्रमंडळाचा रथ सुमारे साडेसात वाजता मंडपातून मार्गस्थ झाला. पुढील तासाभरात आम्ही मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी विभाग चौकात दाखल होऊ, असा आशावाद मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी बोलून दाखवला. मात्र, मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वीच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या जागेवर मुठेश्वर मित्रमंडळ व वीर हनुमान मित्रमंडळ दाखल झाले होते. त्यामुळे या मागील मंडळांना चौकात येण्यास अडथळा निर्माण झाला. तरीदेखील लक्ष्मी रस्त्यावरील मंडळांना थांबवून शिवाजी रस्त्यावरील मंडळांना अर्थात या चार महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सर्वच मंडळांनी केली हाेती. मिरवणुकीत लवकर सहभागी झाल्यात पुढील तीन तासांत आम्ही मिरवणूक विसर्जन संपवू, असे आश्वासन थोरात यांनी पोलिसांना दिले हाेते.

लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या मंडळांना थांबवावे लागेल, या कारणासाठी या महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येऊ दिले जात नव्हते. अखेर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी तोडगा काढत शिवाजी रस्त्यावरील मंडळांना थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पावणेदहा वाजता मुठेश्वर मित्रमंडळ बेलबाग चौकात दाखल झाले. हे मंडळ तब्बल एक तास याच ठिकाणी रेंगाळले होते. जिलब्या मारुती मंडळ दहा वाजून पन्नास मिनिटांनी बेलबाग चौकात दाखल झाले. या मंडळाने देखील सुमारे ३५ मिनिटे वादन केल्यानंतर बाबू गेनू मित्रमंडळाला चौक मोकळा करून दिला. केवळ दहा मिनिटे वादन करण्याचे आश्वासन देऊनही या दोन मंडळांनी सुमारे दीड तास विलंब लावला. परिणामी पुढील मंडळांना चौकात येण्यास उशीर झाला.

मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आमचे मंडळ साडेसात वाजल्यापासून तयार होते; मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. परिणामी पहाटे तीन वाजता मंडळ बेलबाग चौकात आले. लवकर परवानगी मिळाली असती तर विसर्जन लवकर संपविता आली असती.

- अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मित्रमंडळ

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसganpatiगणपती