शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील राजीव गांधी प्राणी उद्यानात १४ हरणांचा मृत्यू; नेमकं कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:15 IST

उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुणे - कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, प्राणी उद्यान प्रशासनालाही याचा मोठा धक्का बसला आहे.उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समोर येताच प्राणी चिकित्सक तसेच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार हरणांचा मृत्यू कोणत्यातरी विषाणूजन्य आजार, अन्नातील बिघाड किंवा अचानक हवामान बदल यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी मृत हरणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणी अहवालासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्राणी उद्यानातील हरिणांच्या देखभाल व आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  प्राणी प्रेम करन करण्यात येत आहे. राजीव गांधी प्राणी उद्यान हे पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. अशा ठिकाणी प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांनी उद्यान प्रशासनाची कार्यपद्धती आणि दक्षतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेबाबत राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयात एवढ्या मोठ्या संख्येने हरीण मृत आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. 

ते पुढे म्हणाले, ४-५ दिवसांपासून प्राणी संग्रहालयातील हरणांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढता होत आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान तज्ज्ञांच्या पथकाने केले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स, शिरवळ यांनी १४ जुलै रोजी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. औंध येथील प्राणीसंग्रहालयात आम्ही अन्न, पाण्याचे नमुने आणि रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी पाठवले आहेत, अशीही माहिती पवार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड