शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST

- पाऊस न झाल्याचा परिणाम, चार गावांतील पाणी योजनाही याच तलावावर अवलंबून, गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी

इंदापूर : मे महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे तरंगवाडी तलावाच्या परिसरातील सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांनी आतापर्यंत तग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मोठा पाऊस न झाल्याने आणि तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तरंगवाडी तलावात तातडीने पाणी सोडावे आणि भविष्यात तलावातील गाळ काढण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

इंदापूर-बारामती राज्य रस्त्यापासून काही अंतरावर, पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असणारा तरंगवाडी तलाव ६७ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असलेला आहे. हा तलाव निरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून भरला जातो. गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, विठ्ठलवाडी, वडापुरी आणि इंदापूर या सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके, फळबागा आणि गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना यावर अवलंबून आहेत. तसेच तलावातून १०५ अधिकृत पाणी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.

मे महिन्यातील पावसामुळे तलावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यामुळे ऊस, मका, कडवळ यासारखी पिके आणि केळी, डाळिंबाच्या बागा सध्या जिवंत आहेत. परंतु, गेल्या दोन-अडीच महिन्यांत मोठा पाऊस न झाल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. येत्या काही दिवसांत पाणी न आल्यास हातातोंडाशी आलेली पिके जळण्याची शक्यता आहे.

गोखळी येथील भैरवनाथ सहकारी पाणीवापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोफणे यांनी सांगितले, “परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण तरंगवाडी तलावावर अवलंबून आहे. मेनंतर मोठा पाऊस न झाल्याने पिके आणि फळबागा धोक्यात आहेत. त्यामुळे खडकवासला कालवा किंवा निरा डाव्या कालव्यातून तलावात तातडीने पाणी सोडावे.” तसेच भविष्यात तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. ही मागणी गोखळीचे माजी सरपंच बापू पोळ, तरंगवाडीचे सरपंच आप्पा शिंदे, झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, विठ्ठलवाडीचे सरपंच दिलीप भोंग, उपसरपंच सुहास बोराटे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.

तलावाचा व्यापक उपयोग

तरंगवाडी तलावातून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्या प्रतिष्ठान, दूधगंगा आणि सोनाई दूध संघ यांना पाणीपुरवठा होतो. यापैकी काही संस्थांनी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली असली, तरी तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. यापूर्वी इंदापूर नगरपरिषदेला तलावातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्यांनी तो नाकारला. आता पुन्हा तेथून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

तलावात पाणी सोडा

नितीन गोफणे यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि प्रशासनाकडे तलावात पाणी सोडण्याची मागणी लवकरच केली जाणार आहे. तसेच दीड महिन्यापूर्वी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा पाठपुरावा करून तलावाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणीही पुढे केली जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड