शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST

- पाऊस न झाल्याचा परिणाम, चार गावांतील पाणी योजनाही याच तलावावर अवलंबून, गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी

इंदापूर : मे महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे तरंगवाडी तलावाच्या परिसरातील सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांनी आतापर्यंत तग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मोठा पाऊस न झाल्याने आणि तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तरंगवाडी तलावात तातडीने पाणी सोडावे आणि भविष्यात तलावातील गाळ काढण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

इंदापूर-बारामती राज्य रस्त्यापासून काही अंतरावर, पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असणारा तरंगवाडी तलाव ६७ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असलेला आहे. हा तलाव निरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून भरला जातो. गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, विठ्ठलवाडी, वडापुरी आणि इंदापूर या सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके, फळबागा आणि गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना यावर अवलंबून आहेत. तसेच तलावातून १०५ अधिकृत पाणी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.

मे महिन्यातील पावसामुळे तलावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यामुळे ऊस, मका, कडवळ यासारखी पिके आणि केळी, डाळिंबाच्या बागा सध्या जिवंत आहेत. परंतु, गेल्या दोन-अडीच महिन्यांत मोठा पाऊस न झाल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. येत्या काही दिवसांत पाणी न आल्यास हातातोंडाशी आलेली पिके जळण्याची शक्यता आहे.

गोखळी येथील भैरवनाथ सहकारी पाणीवापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोफणे यांनी सांगितले, “परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण तरंगवाडी तलावावर अवलंबून आहे. मेनंतर मोठा पाऊस न झाल्याने पिके आणि फळबागा धोक्यात आहेत. त्यामुळे खडकवासला कालवा किंवा निरा डाव्या कालव्यातून तलावात तातडीने पाणी सोडावे.” तसेच भविष्यात तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. ही मागणी गोखळीचे माजी सरपंच बापू पोळ, तरंगवाडीचे सरपंच आप्पा शिंदे, झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, विठ्ठलवाडीचे सरपंच दिलीप भोंग, उपसरपंच सुहास बोराटे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.

तलावाचा व्यापक उपयोग

तरंगवाडी तलावातून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्या प्रतिष्ठान, दूधगंगा आणि सोनाई दूध संघ यांना पाणीपुरवठा होतो. यापैकी काही संस्थांनी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली असली, तरी तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. यापूर्वी इंदापूर नगरपरिषदेला तलावातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्यांनी तो नाकारला. आता पुन्हा तेथून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

तलावात पाणी सोडा

नितीन गोफणे यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि प्रशासनाकडे तलावात पाणी सोडण्याची मागणी लवकरच केली जाणार आहे. तसेच दीड महिन्यापूर्वी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा पाठपुरावा करून तलावाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणीही पुढे केली जाईल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड