शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाची शंभरी तीन विषयांमध्ये होणार ग्रंथबद्ध; शंभर वर्षांचा इतिहास उलगडणार

By राजू इनामदार | Updated: November 16, 2025 12:21 IST

देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तब्बल १०० वर्षांचा इतिहास तीन विषयांमध्ये शब्दबद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात झाली आहे. साहित्य महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. लेखक तसेच विषयांची निश्चिती करून प्रकाशनासाठी सन २०२७ मध्ये होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही वेळही ठरवली आहे.

देशातील कोणत्याही प्रादेशिक भाषेला नाही ते वार्षिक संमेलनाचे वैभव मराठी भाषेला लाभले आहे. अगदी सुरुवातीच्या संमेलनापासूनच्या प्रत्येक संमेलनातील असंख्य घटना-घडामोडींचा हा भलामोठा 'शब्दपट'च असणार आहे. पुढील वर्षी (सन २०२६) ९९वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यात या ग्रंथांची घोषणा केली जाईल. त्यानंतर पुढील वर्षभर त्यावर काम सुरू राहील. त्यानंतर सन २०२७ मध्ये होणाऱ्या १००व्या संमेलनात या तीनही ग्रंथांचे प्रकाशन होईल.

महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. संमेलन झाल्यानंतर आलेल्या वृत्तांतामधून किंवा काही लेखांमधून व अहमदनगरच्या साहित्य संमेलनानंतर संयोजकांनी प्रकाशित केलेल्या 'संवाद' सारख्या पुस्तकातून क्वचितवेळी यावर लिहिले गेले आहे. 'संमेलनाध्यक्षांची भाषणे' यासारखी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, मात्र एकूण इतिहास असे कधीही लिहिला गेला नाही. त्यामुळेच हा प्रकल्प साकार करण्याची कल्पना पुढे आली, असे जोशी यांनी सांगितले.'राजकीय व सामाजिक भूमिका' असा एक विषय असेल 'लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या' या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून दिलेल्या संदेशापासून ते अलीकडच्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेल्या राजा तू चुकतो आहेस' या निर्देशापर्यंत, व्हाया आणीबाणीतील दुर्गा भागवत अशा प्रत्येक संमेलनाध्यक्षांचे धोरण, भूमिका,त्याचा परिणाम याचा धांडोळा या विषयामधून घेतला जाईल, महामंडळाने प्रा. प्रकाश पवार यांना याबाबत पत्र दिले असून, त्यांनी महामंडळाची विनंती मान्यही केली आहे. 'वाङ्‌मयीन भूमिका' हा दुसरा विषय आहे. यामध्ये साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या 'संजीवन समाधीची अनुभूती देते ते साहित्य' या व्याख्येपासून ते 'कलेसाठी कला की जीवनासाठी कला' या वादापर्यंत प्रत्येक वाङ्मयीन वादविवादाविषयी खोलवर माहिती घेऊन लिहिले जाईल. प्रा. रणधीर शिंदे यांनी यावर काम सुरू केले आहे.

मराठी भाषिकांच्या संस्कृतीत फरक पडला ?

'सांस्कृतिक भूमिका' हा तिसरा विषय असून, यातही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठी संस्कृतीविषयी काय काम झाले? त्याचा मराठी साहित्यावर काय परिणाम झाला?, मुळात संमेलनामुळे मराठी भाषिकांच्या संस्कृतीत काय फरक पडला? वाचकांच्या भूमिकेत कायकाय बदल झाले? याचा सविस्तर आढावा घेतला जाईल. अविनाश सप्रे यांना महामंडळाने याविषयी जबाबदारी दिली.

 यासाठीचे संदर्भसाहित्य, माहिती वगैरे सर्च आवश्यक गोष्टी महामंडळाकडून संबंधित लेखकांना दिल्या जातील. संमेलनाला उपस्थित व्यक्तींच्या मुलाखती, वगैरे गोष्टींचा तीनही खंडात समावेश असेल. सध्या प्राथमिक स्वरूपात हे काम सुरू आहे, त्याला अंतिम स्वरूप लवकरच मिळेल. तीनही ग्रंथ परिपूर्ण, सविस्तर, रंजक, माहितीपूर्ण व संदर्भग्रंथांचे मूल्य असलेले असे व्हावेत, अशी अपेक्षा आहे.  -  प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Literary Meet's Centenary: History to be Documented in Three Volumes

Web Summary : The 100-year history of the Marathi Literary Meet will be documented in three volumes, covering political, literary, and cultural aspects. The project, initiated by the Sahitya Mahamandal, aims for publication by 2027, coinciding with the 100th meet.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे