शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली;पंधरा दिवस उलटूनही धोकादायक पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:31 IST

- अहवाल देण्यास वेळ अपुरा असल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाकडे दुर्लक्ष

पुणे : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक, अतिधोकादायक जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलांची ७ दिवसांत बांधकाम तपासणीनंतर (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सर्वच यंत्रणांनी केराची टोपली दाखवल्यासारखी स्थिती आहे. आदेशाला २ आठवडे उलटले, तरी राज्य परिवहन महामंडळ वगळता एकाही यंत्रणेने अहवाल सादर केला नाही. अहवाल देण्यास वेळ अपुरा असल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून जिल्हाधिकाऱ्यांची पकड नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला १५ दिवसांत अहवाल देण्याचे सांगितले होते. मात्र, समितीचा अहवालही अद्याप मिळाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने आढावा बैठकांचा सपाटा लावला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील धोकादायक असलेले पूल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यात जिल्हा परिषद, नगर परिषदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, एसटी महामंडळ अशा संबंधित यंत्रणांना एका आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्याकडे एसटी महामंडळ वगळता सर्व यंत्रणांनी दुर्लक्ष केले. यावरून एखाद्या दुर्घटनेनंतरच आढावा बैठका आणि अहवालाची चर्चा होते. नंतर पुढे काहीच होत नाही.

जिल्हा प्रशासन समितीकडूनच आदेशाला हरताळ

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कुंडमळा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमली. त्यात उपवनसंरक्षक, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. अहवालातील दोषींवर कारवाईचा डुडी यांनी इशारा दिला होता. यात प्रशासनाची चूक असल्यास तीही दुरुस्त केली जाईल. घटनेच्या आठवड्यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतरही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रतिबंधात्मक सूचनांमध्येही सुधारणा करायची असल्यास ही समिती सूचना करणार आहे. त्याचीही अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. समितीला दिलेली १५ दिवसांची मुदतही आता संपली आहे. अजूनही समितीचा अहवाल तयार झालेला नाही. जर प्रशासकीय समितीचा अहवालास विलंब झाला झाला आहे, तर अन्य यंत्रणांचे काय, असा सवाल आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी