शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली;पंधरा दिवस उलटूनही धोकादायक पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:31 IST

- अहवाल देण्यास वेळ अपुरा असल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाकडे दुर्लक्ष

पुणे : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील धोकादायक, अतिधोकादायक जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलके, रेल्वे पुलांची ७ दिवसांत बांधकाम तपासणीनंतर (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सर्वच यंत्रणांनी केराची टोपली दाखवल्यासारखी स्थिती आहे. आदेशाला २ आठवडे उलटले, तरी राज्य परिवहन महामंडळ वगळता एकाही यंत्रणेने अहवाल सादर केला नाही. अहवाल देण्यास वेळ अपुरा असल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. यावरून जिल्हाधिकाऱ्यांची पकड नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला १५ दिवसांत अहवाल देण्याचे सांगितले होते. मात्र, समितीचा अहवालही अद्याप मिळाला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने आढावा बैठकांचा सपाटा लावला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील धोकादायक असलेले पूल, साकव, इमारती, वाडे, जाहिरात फलके काढून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यात जिल्हा परिषद, नगर परिषदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, एसटी महामंडळ अशा संबंधित यंत्रणांना एका आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्याकडे एसटी महामंडळ वगळता सर्व यंत्रणांनी दुर्लक्ष केले. यावरून एखाद्या दुर्घटनेनंतरच आढावा बैठका आणि अहवालाची चर्चा होते. नंतर पुढे काहीच होत नाही.

जिल्हा प्रशासन समितीकडूनच आदेशाला हरताळ

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कुंडमळा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमली. त्यात उपवनसंरक्षक, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. अहवालातील दोषींवर कारवाईचा डुडी यांनी इशारा दिला होता. यात प्रशासनाची चूक असल्यास तीही दुरुस्त केली जाईल. घटनेच्या आठवड्यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतरही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रतिबंधात्मक सूचनांमध्येही सुधारणा करायची असल्यास ही समिती सूचना करणार आहे. त्याचीही अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. समितीला दिलेली १५ दिवसांची मुदतही आता संपली आहे. अजूनही समितीचा अहवाल तयार झालेला नाही. जर प्रशासकीय समितीचा अहवालास विलंब झाला झाला आहे, तर अन्य यंत्रणांचे काय, असा सवाल आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी