शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर एसटी स्थानक पुर्नबांधणी अजूनही कागदावरच; प्रवाशांचा त्रास कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:05 IST

- अडथळे मिटल्याचा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा दावा

पुणे : शिवाजीनगर एस.टी. स्थानकाच्या पुर्नबांधणीचा विषय अजूनही कागदावरच राहिला आहे. यातील सर्व अडथळे मिटल्याचा दावा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला, मात्र तरीही अजून किमान ५ वर्षे तरी हे स्थानक अस्तित्वात येणे अवघड आहे. जागा किती वर्षे भाडेकराराने द्यायची या प्रमुख मुद्द्यावर निर्णय झाला असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

विधानसभा अधिवेशनातील कामकामाजाची माहिती देण्यासाठी आमदार शिरोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अधिवेशनातील प्रश्नोत्तरासंबधी सांगितल्यानंतर त्यांना शिवाजीनगर एस.टी. स्थानक व त्या परिसरात सुरू असलेल्या हिंजवडी मेट्रोच्या कामाची माहिती याबाबत विचारले असता त्यांनी ही दोन्ही कामे गती नको इतकी संथ गतीने सुरू असल्याचे मान्य केले. मात्र या विषयांना प्राधान्य दिले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

आमदार शिरोळे म्हणाले, शिवाजीनगरची जागा किती वर्षे कराराने द्यायची हा प्रश्न होता, त्यावर आता निर्णय झाला आहे. सामंजस्य कराराची कलमे वगैरे सर्व गोष्टींची पूर्तता झाली आहे. आता पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल. अधिवेशनात शहराशी संबधित अनेक प्रश्न उपस्थित केले असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणच्या सीसीटिव्ही बाबत धोऱण ठरवले जावे ही मागणी मान्य होऊन त्यासंदर्भात समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला.

शहरातील ओव्हरहेड (इमारतींवरून) जाणाऱ्या केबल्सच्या जाळ्यांबाबतही आता धोरणात्मक निर्णय होईल, त्याशिवाय पुणे शहर मेडिकल टुरीझम व्हावे, संरक्षण क्षेत्राशी संबधित साधनांच्या उत्पादनांचा इथे हब व्हावा अशा अनेक विषयांवर चर्चा उपस्थित करता आली, त्यातील काही बाबींवर आता सरकार स्तरावर निर्णय होईल असे शिरोळे यांनी सांगितले.

सहा वर्षे होऊनही एस.टी.स्थानक मुळजागी नाहीच

सहा वर्षे झाली या स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडीमध्ये करण्यात आले आहे. एसटीच्या नियमीत प्रवाशांना त्याचा आर्थिक भुर्दंड तर सहन करावा लागतोच आहे, शिवाय वेळही वाया जात आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत सुरू होणाऱ्या भूयारी कामासाठी म्हणून महामेट्रो कंपनी व एस.टी. महामंडळ यांच्यात करार झाला होता. भूयारी मेट्रो स्थानक व वरील बाजूस पुन्हा एस.टी. स्थानक व ते महामेट्रो बांधून देणार असा हा करार होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला. महामंडळच पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) तत्वावर इथे व्यापारी संकुलासह स्थानक बांधणार असा निर्णय झाला. त्यालाही आता ५ वर्षे झाली, दरम्यानच्या काळात आघाडी सरकार गेले, युती सरकार आले. त्यानंतर विधानसभा निवडणूक होऊन नवे युती सरकार सत्तेवर आले, मात्र एस.टी. स्थानकाचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड