शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:42 IST

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा आणि पेरणे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव २० जून २०२५ रोजी पावसाळ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दीड महिना उलटूनही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडली असून, हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरेगाव भीमा आणि पेरणे ग्रामपंचायतींनी नवीन बंधारा बांधण्याची मागणी केली असून, याबाबत पत्रव्यवहार आणि २६ मे रोजी दूरध्वनीवरून पाठपुरावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी केलेली निकृष्ट दर्जाची दुरुस्तीही अतिवृष्टीत वाहून गेली. स्थानिकांनी दुरुस्तीच्या दर्जाबाबत तक्रार केली होती, परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. 

नवीन बंधाऱ्याचा प्रस्ताव बारगळला

२१ जून रोजी उपअभियंता अश्विन पवार यांनी बंधाऱ्याची पाहणी करून नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा प्रस्ताव बारगळला असून, केवळ १९८७ च्या जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचे ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

पाणी योजनांवर संकट

बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली येथील पाणी योजना, तसेच लोणीकंद पावर हाऊस आणि जेएसपीएम कॉलेजच्या पाणी योजनांवर परिणाम झाला आहे. सुमारे ४०० हून अधिक शेतकऱ्यांच्या पाणी योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतीसाठी पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे संकट उभे आहे. पाटबंधारे विभाग हातावर हात ठेवून बसला असून, लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा आणि कोरडे पडलेले नदीपात्र, यामुळे परिसरातील शेती आणि पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड