शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:42 IST

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा आणि पेरणे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव २० जून २०२५ रोजी पावसाळ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दीड महिना उलटूनही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडली असून, हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरेगाव भीमा आणि पेरणे ग्रामपंचायतींनी नवीन बंधारा बांधण्याची मागणी केली असून, याबाबत पत्रव्यवहार आणि २६ मे रोजी दूरध्वनीवरून पाठपुरावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी केलेली निकृष्ट दर्जाची दुरुस्तीही अतिवृष्टीत वाहून गेली. स्थानिकांनी दुरुस्तीच्या दर्जाबाबत तक्रार केली होती, परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. 

नवीन बंधाऱ्याचा प्रस्ताव बारगळला

२१ जून रोजी उपअभियंता अश्विन पवार यांनी बंधाऱ्याची पाहणी करून नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा प्रस्ताव बारगळला असून, केवळ १९८७ च्या जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचे ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

पाणी योजनांवर संकट

बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली येथील पाणी योजना, तसेच लोणीकंद पावर हाऊस आणि जेएसपीएम कॉलेजच्या पाणी योजनांवर परिणाम झाला आहे. सुमारे ४०० हून अधिक शेतकऱ्यांच्या पाणी योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतीसाठी पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे संकट उभे आहे. पाटबंधारे विभाग हातावर हात ठेवून बसला असून, लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा आणि कोरडे पडलेले नदीपात्र, यामुळे परिसरातील शेती आणि पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड