शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:42 IST

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा आणि पेरणे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा भराव २० जून २०२५ रोजी पावसाळ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दीड महिना उलटूनही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडली असून, हजारो हेक्टर शेतीच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला आहे. कोरेगाव भीमा आणि पेरणे ग्रामपंचायतींनी नवीन बंधारा बांधण्याची मागणी केली असून, याबाबत पत्रव्यवहार आणि २६ मे रोजी दूरध्वनीवरून पाठपुरावा केला. मात्र, पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी केलेली निकृष्ट दर्जाची दुरुस्तीही अतिवृष्टीत वाहून गेली. स्थानिकांनी दुरुस्तीच्या दर्जाबाबत तक्रार केली होती, परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. 

नवीन बंधाऱ्याचा प्रस्ताव बारगळला

२१ जून रोजी उपअभियंता अश्विन पवार यांनी बंधाऱ्याची पाहणी करून नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा प्रस्ताव बारगळला असून, केवळ १९८७ च्या जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचे ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

पाणी योजनांवर संकट

बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली येथील पाणी योजना, तसेच लोणीकंद पावर हाऊस आणि जेएसपीएम कॉलेजच्या पाणी योजनांवर परिणाम झाला आहे. सुमारे ४०० हून अधिक शेतकऱ्यांच्या पाणी योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतीसाठी पाणी उचलणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

पावसाळ्यात नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे संकट उभे आहे. पाटबंधारे विभाग हातावर हात ठेवून बसला असून, लोकप्रतिनिधीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा आणि कोरडे पडलेले नदीपात्र, यामुळे परिसरातील शेती आणि पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड