शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

जिल्ह्यामधील २३ धोकादायक गावांचे पुनर्वसन होणे झाले अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 10:04 IST

- माळीण दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण; धोकादायक गावांच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

- निलेश काण्णव

घोडेगाव : माळीण दुर्घटनेला ३० जुलै २०२५ रोजी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करून वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये जिल्हाधिकारी, पुणे यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये धोकादायक गावांचे पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आंबेगाव तालुक्यातील काही गावांचे पुनर्वसन मार्गी लागले असले, तरी जिल्ह्यातील इतर धोकादायक गावांकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचे दिसून येते.

माळीण दुर्घटनेनंतर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ९५ गावे आणि ८ वाड्या-वस्त्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये डोंगरउतारावर वसलेली गावे, डोंगराच्या पायथ्याशी धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्या, धरण परिसरातील जोखमीच्या पातळीवरील गावे आणि डोंगरांना भेगा पडलेल्या परिसरांचा समावेश होता. या सर्वेक्षणात २३ गावे भूस्खलनाच्या धोक्याखाली असल्याचे नमूद करण्यात आले. या गावांचे तातडीने पुनर्वसन करणे, पावसाळ्यात लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

धोकादायक गावांची यादीसर्वेक्षणात समाविष्ट धोकादायक गावांमध्ये खालील गावांचा समावेश आहे :

आंबेगाव तालुका : पोखरी बेंढारवाडी, जांभोरी काळवाडी, माळीण पसारवाडी, आसाणे, मेघोली, फुलवडे भगतवाडी.भोर तालुका : धानवडी, कोर्ले जांभवली, डेहणे, पांगरी सोनारवाडी

जुन्नर तालुका : निमगिरी अंतर्गत तळमाचीवाडीखेड तालुका : भोमाळे, भोरगिरीअंतर्गत पदरवस्ती

मावळ तालुका : माऊ मोरमाचीवाडी, गभालेवस्ती, सावळे कडकराई, लोहगड, मालेवाडी, ताजे, बोरज, तुंग श्रीभैरवनाथ मंदिर परिसर, भुशी.मुळशी तालुका : घुटके

वेल्हा तालुका : आंबवणे, घोळ. 

पुनर्वसनाची प्रगतीआंबेगाव तालुक्यातील मेघोली गावाचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. पोखरी बेंढारवाडी आणि जांभोरी काळवाडी येथे घरे बांधण्यासाठी जागा निश्चित झाली असून, सपाटीकरणाचे काम सुरू आहे. माळीण पसारवाडीसाठीही जागा निश्चित झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी ठोस कार्यवाही दिसून येत नाही. प्रत्येक पावसाळ्यात या गावांचा प्रश्न चर्चेला येतो; परंतु त्यानंतर प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.प्रशासनाकडून अपेक्षित पावले

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, जिल्ह्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक रहिवाशांनी पावसाळ्यातील धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली असून, तातडीने पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड