शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट दरवाढीवरून राजकीय नेत्यांचा दुहेरी सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:20 IST

‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

पुणे : पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून, प्रवाशांना झळ बसणार आहे. त्यामुळे भाडेवाढ रद्द करावी. गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी काढला, पण सत्ताधारी भाजपने पीएमपी सक्षम करण्यासाठी दरवाढ योग्य असल्याचे स्पष्ट केले, शिवाय संस्था टिकविण्यासाठी आवश्यक आहे, असा सूर काढला.

सजग नागरिक मंच आणि पीएमपी प्रवासी मंच यांच्या वतीने ‘पीएमपी प्रवासी भाढेवाढ प्रवाशांसाठी व पीएमपीसाठी तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांची मते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, रिपब्लिकन पार्टीचे डॉ.सिद्धार्थ धेंडे, काँग्रेसचे संजय बालगुडे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सचिव संजय शितोळे आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णयच बेकायदा आहे. एखादा धोरणात्मक निर्णय घेताना लोकांचा प्रतिनिधी संचालक मंडाळामध्ये असणे आवश्यक असते, पण आरटीएमध्येही लोकांचा प्रतिनिधी नव्हता, तसेच पीएमटी आणि पीसीएमटीचे एकत्रिकरणाचा निर्णय शहरासाठी मारक ठरत आहे.

डॉ.धेंडे म्हणाले, पीएमपीच्या दरवाढीला आमच्या पक्षाचा विरोध आहे, कारण या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. दरवाढ करताना संचालन तूट का वाढते, हे पीएमपीने जाहीर केलेले नाही. प्रशासकीय चुकीमुळे तूट वाढत आहे.

बालगुडे म्हणाले, पीएमपीने अकरा वर्षांनंतर दरवाढ केली असली, तरी ही दरवाढ खूप आहे. ती कमी करावी. या दरवाढीचा दुसऱ्या आणि शेवटच्या स्टेजमध्ये प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार आहे. तिकीट दरवाढ न होण्यासाठी पीएमपीच्या जागा विकसित करून, जाहिरातीमधून उत्पन्न वाढवावे.

काही गोष्ट बदल करण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करावा लागतो. २०१४ नंतर ही दरवाढ केली आहे. या काळात सीएनजी दर वाढले. एसटी महामंडळ, मुंबईत बेस्टने दरवाढ केली. एखादी संस्था जगण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. पीएमपीला सदृढ करण्यासाठीच ही दरवाढ केली असून, ती योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून पीएमपीची तूट वाढत आहे. ही तूट दोन्ही महापालिका देतात. त्यामुळे दरवाढ करू नकाच, हे योग्य नाही. पीएमपी सक्षम करण्यासाठी तिथे चालणाऱ्या गैरप्रकाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे संदीप खर्डेकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpassengerप्रवासी