शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

अखेर १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा, गुंजवणी धरणात सुरू झाली बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:44 IST

- शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी जात नव्हते शाळेत, स्थानिकांनी निवेदन देऊनही घेतली जात नव्हती दखल

वेल्हे : राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणात बोट सुरू झाल्याने गेवंडे परिसरातील १० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांचे शिक्षण घेता येणार असल्याने सरपंच सुनिता खुटेकर यांनी ‘दैनिक लोकमत’चे आभार मानले आहेत. ‘गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित’ या मथळ्याखाली दिनांक १८ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. याच बातमीची दखल घेत जलसंपदा विभागाने बोट सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निरा देवधर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील जलसंपदा विभाग बोट सुरू करण्यासाठी कानाडोळा करीत होते गुंजवणी धरणाग्रस्तांनी गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील रस्त्यासाठी आपल्या जमिनी मोबदला मिळण्याच्या अगोदर दिल्या आहेत, कारण सर्व गावांत रस्ता व्यवस्थित जाईल, या गावांना रस्त्यासाठी १२ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या रस्त्याचे टेंडर झाले असून, चार महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. पण, रस्ता पूर्ण झाला नाही. 

गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील विद्यार्थी निवी येथील माध्यमिक विद्यालय व येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुंजवणी धरणातील बोटीचा आधार घ्यावा लागतो. दरवर्षी बोट सुरू होती, परंतु या वर्षी बोट सुरू नसल्याने अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे १६ जूनपासून विद्यार्थी शाळेत जात नव्हते. त्यामुळे येथील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले असून, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराने बोट चालवून गावातील प्रवाशांची सोय करावी, अशी अट टेंडरमध्ये असूनदेखील संबंधित ठेकेदार बोट चालवित नव्हता. गेवंडे, गेळगणी, खुटेकर वस्ती, धनगर वस्ती येथील नागरिकांना देखील दळणवळणासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.कानंद गेवंडे, घिसर काठ रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोटद्वारे शालेय विद्यार्थी व प्रकल्पग्रस्तांची वाहतूक करणे बंधनकारक आहे, असे निविदा प्रक्रियामध्ये स्पष्ट असताना देखील संबंधित ठेकेदाराने यांत्रिकी बोट सुरू केली नाही. तरी, विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ताबडतोब ती बोट सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुनिता खुटेकर यांनी केली होती. तरीदेखील जलसंपदा विभागाने याकडे काणाडोळा केला होता. परंतु, ‘दैनिक लोकमत’मध्ये गुंजवणी धरणात बोट सुरू नसल्याने दहा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित या मथळ्याखाली बातमी लागल्यानंतर जलसंपदा विभाग जागा झाला व ताबडतोब बोट सुरू केली.

 कानंद गेवंडे, घिसर येथील १० विद्यार्थी शिक्षणासाठी व शेतकऱ्यांना दूध संकलन करण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी ‘दैनिक लोकमत’ने आवाज उठवला. म्हणून, बोट सुरू झाली त्याबद्दल ‘दैनिक लोकमत’चे मनापासून आभार. - विकास कडू, माजी सरपंच, निवी गेवंडे ग्रामपंचायत

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducation Sectorशिक्षण क्षेत्र