शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तीन वर्षांच्या कालावधीत एम सँड क्रशर सुरू करा नाही तर परवानगी रद्द;चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:58 IST

सद्य:स्थितीत क्रशर मालकांनी तीन वर्षांच्या कालावधीत एम सँड क्रशर सुरू केला नाही तर त्यांची परवानगी रद्द केली जाईल असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात अद्याप गौण खनिज क्षेत्र जाहीर झालेले नाही. त्यामुळे कृत्रिम वाळू उत्पादकांना वेगवेगळ्या विभागांची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत गौण खनिज क्षेत्राचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करावा असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच सद्य:स्थितीत क्रशर मालकांनी तीन वर्षांच्या कालावधीत एम सँड क्रशर सुरू केला नाही तर त्यांची परवानगी रद्द केली जाईल असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत नव्याने लागू केलेल्या एम सँड धोरणासंदर्भात बावनकुळे यांनी खाण चालक, क्रशर मालक, बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.

अनेक खाणचालक क्रशर मालकांनी या नव्या धेरणातील अडचणी मांडल्या. त्यावेळी गौण खनिज क्षेत्राचा आराखडा जाहीर झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पुण्यासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना गौण खनिज क्षेत्र जाहीर करावे असे आदेश दिले. एम सँड धोरण चांगले आहे. ग्रामपंचायतींच्या ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची आवश्यकता नाही ही बाब स्तुत्य आहे. मात्र दीर्घ मुदतीचा खाणपट्टा घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. ग्रामपंचायतीची एनओसी रद्द करून चार वेगळ्या प्रशासकीय परवान्या घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतींनी तीस दिवसांच्या कालावधीत परवानगी न दिल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर राहिल व परवानगी मिळाली असे गृहित धरण्यात येईल, अशी सुधारणा शासन निर्णयात केली जाईल, असे बावनकुळे यांनी जाहीर केले.

या धोरणातील सरसकट सवलती खाण उद्योगांना मिळणार नाहीत. खाणचालकांनी एम सँड प्रकल्प तीन वर्षांच्या आत टाकणे बंधनकारक आहे. त्यानंतरच त्यांना सर्व सवलती मिळतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. अन्यथा सध्याचा प्रकल्पही बंद करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड