शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

चाकण : चाकणमधील वाहतूक कोंडी आता स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणारी ही कोंडी एकप्रकारे चक्रव्यूहच बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील मोई-चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, स्पाइसर चौक, आळंदी फाटा, बंगला वस्ती चौक, बालाजी नगर, चाकण चौक, आंबेठाण चौक आणि भाम फाटा येथे वाहतूक कोंडीने कहर केला आहे. या ठिकाणी चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत असून, वाहनचालकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरही देहू फाटा, खालुंब्रे, ह्युंदाई चौक, एचपी चौक, महाळुंगे, खराबवाडी, वाघजाईनगर फाटा, राणूबाईमळा, तळेगाव चौक, माणिक चौक, मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी येथेही वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला आहे. चाकण-आंबेठाण-वासुली फाटा मार्गावरही हेच चित्र आहे.

पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य, अपघातांना निमंत्रण

चाकण परिसरात पावसाने हजेरी लावल्याने महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहने खड्ड्यांमध्ये अडकून बंद पडतात, ज्यामुळे कोंडी आणखी गंभीर होते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत.

रुग्णवाहिका, स्कूलबसही अडकल्या

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना बसत आहे. रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे, तर स्कूलबसच्या कोंडीमुळे लहान मुलांना ताटकळत बसावे लागत आहे. बेशिस्त रिक्षाचालक आणि कंपनी बसचालकांमुळेही कोंडीत भर पडत आहे. औद्योगिक परिसरात बस, ट्रक, टेम्पो आणि जड वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.

 उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही निराशा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट महिन्यात चाकणचा दौरा करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चाकण आणि आंबेठाण चौकातील विजेचे खांब हटवणे, खड्डे बुजवणे आणि अतिक्रमणे हटवण्यासारखी काही कामे झाली. मात्र, या उपाययोजनांचा वाहतूक कोंडीवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट, कोंडी कमी होण्याऐवजी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले जाते; पण ठोस उपाययोजना होतच नाहीत,’ अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

नागरिकांचे प्रश्न -

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?

खड्डेमुक्त रस्ते आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभावी व्यवस्था का होत नाही?

रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना प्राधान्य का मिळत नाही?

स्थानिकांची मागणी -

नागरिकांनी रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक नियोजनासाठी तज्ज्ञ समिती, प्रभावी पाणी निचरा व्यवस्था आणि बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत चाकणच्या या चक्रव्यूहातून सुटका होणे कठीण आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड