शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चाकणची वाहतूक कोंडी: चक्रव्यूहात अडकले नागरिक, उपाययोजनांचा अभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

चाकण : चाकणमधील वाहतूक कोंडी आता स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणारी ही कोंडी एकप्रकारे चक्रव्यूहच बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतरही या समस्येवर ठोस उपाययोजना झाल्या नसून, उलट वाहतूक कोंडीत अधिकच भर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरील मोई-चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, स्पाइसर चौक, आळंदी फाटा, बंगला वस्ती चौक, बालाजी नगर, चाकण चौक, आंबेठाण चौक आणि भाम फाटा येथे वाहतूक कोंडीने कहर केला आहे. या ठिकाणी चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत असून, वाहनचालकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरही देहू फाटा, खालुंब्रे, ह्युंदाई चौक, एचपी चौक, महाळुंगे, खराबवाडी, वाघजाईनगर फाटा, राणूबाईमळा, तळेगाव चौक, माणिक चौक, मेदनकरवाडी आणि कडाचीवाडी येथेही वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला आहे. चाकण-आंबेठाण-वासुली फाटा मार्गावरही हेच चित्र आहे.

पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य, अपघातांना निमंत्रण

चाकण परिसरात पावसाने हजेरी लावल्याने महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहने खड्ड्यांमध्ये अडकून बंद पडतात, ज्यामुळे कोंडी आणखी गंभीर होते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत.

रुग्णवाहिका, स्कूलबसही अडकल्या

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना बसत आहे. रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे, तर स्कूलबसच्या कोंडीमुळे लहान मुलांना ताटकळत बसावे लागत आहे. बेशिस्त रिक्षाचालक आणि कंपनी बसचालकांमुळेही कोंडीत भर पडत आहे. औद्योगिक परिसरात बस, ट्रक, टेम्पो आणि जड वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.

 उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही निराशा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट महिन्यात चाकणचा दौरा करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर चाकण आणि आंबेठाण चौकातील विजेचे खांब हटवणे, खड्डे बुजवणे आणि अतिक्रमणे हटवण्यासारखी काही कामे झाली. मात्र, या उपाययोजनांचा वाहतूक कोंडीवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट, कोंडी कमी होण्याऐवजी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले जाते; पण ठोस उपाययोजना होतच नाहीत,’ अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

नागरिकांचे प्रश्न -

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय कधी होणार?

खड्डेमुक्त रस्ते आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभावी व्यवस्था का होत नाही?

रुग्णवाहिका आणि स्कूलबस यांना प्राधान्य का मिळत नाही?

स्थानिकांची मागणी -

नागरिकांनी रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक नियोजनासाठी तज्ज्ञ समिती, प्रभावी पाणी निचरा व्यवस्था आणि बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत चाकणच्या या चक्रव्यूहातून सुटका होणे कठीण आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड