शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Pune traffic : उदंड झाल्या कॅब अन् रिक्षा; पुणेकरांना कोंडीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:22 IST

वाहतूककोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला पुणेकर आधीच वैतागले आहेत. परंतु ओला, उबेर या खासगी कंपनीच्या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने कॅबचालकांची संख्या भरमसाट वाढली आहे.

- अंबादास गवंडीपुणे : नागरिकांना सहज उपलब्ध होणाऱ्या कॅबमुळे शहरातील कॅबची संख्या भरमसाट वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटिल होत आहे. त्यातच भर म्हणून कॅब आणि रिक्षाचालक प्रवासी शाेधण्यासाठी भर रस्त्यांवर वाहन उभे करतात. त्यामुळे शहरातील फर्ग्युसन, बाजीराव, टिळक रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड यांसह इतर प्रमुख रस्त्यांवर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना यातून मार्ग काढताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

वाहतूककोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला पुणेकर आधीच वैतागले आहेत. परंतु ओला, उबेर या खासगी कंपनीच्या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होत असल्याने कॅबचालकांची संख्या भरमसाट वाढली आहे. दुसरीकडे मुक्तपरवाना धोरणामुळे रिक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे वाहन लावण्यासाठी शहरात पार्किंगची असलेली सोय कमी पडत आहे, तर दुसरीकडे वेळेत कॅब उपलब्ध होत असल्याने प्रवाशांचा ओढा कॅबकडे वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या प्रमाणात कॅबची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.

पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध असताना प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्याच संधीचा फायदा कॅबचालक घेत आहेत. परंतु, प्रवासी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कॅब व रिक्षा मुख्य रस्त्यावर बिनधास्त उभे करण्यात येते. त्यामुळे शहरातील वाढलेल्या वाहनांमुळे रस्त्यांंवर भार पडत आहेत.

नव्या उद्योजकांमुळे कॅबच्या संख्येत भर

शहरात जवळपास ७० हजार कॅबची वाहने असून, कॅबची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या सुमारे २० आहेत. ही वाढ मागील दीड ते दोन वर्षांत झाली. त्यामुळे ओला, उबेर या कंपन्यांची मक्तेदारी कमी झाली आहे. शिवाय नवीन उद्योजक कॅब व्यवसायात सामील झाल्याने कॅबची संख्या वाढली आहे. शहरात दररोज कॅबच्या माध्यमातून सुमारे ५ ते ६ लाख नागरिक यातून प्रवास करीत आहेत. परंतु, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे शिस्तीने पालन होत नसल्याने कोंडीत भर पडत आहे, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘कॅब’वाढीची ही आहेत कारणे :

- ऑनलाइन बुक केल्यावर वेळेत उपलब्ध होते.

- जवळचा किंवा लांबचा प्रवास असले तरी सोयीचे.

- तरुणांना सहज रोजगार उपलब्ध होतो.

- दिवसेंदिवस प्रवाशांचा ओढा वाढत आहे.

- काही रिक्षाचालक कॅब व्यवसायाकडे वळले.

‘कॅब’मुळे कोंडी होण्याची ही आहेत कारणे :

- प्रवासी सोडल्यावर पुन्हा प्रवासी शोधतात.

- यात बराच वेळ रस्त्यांवर थांबतात.

- अनेकवेळा प्रवासी लवकर भेटत नाही.

- मुख्य रस्त्यावर पार्किंगची सोय नाही.

- गल्लीबोळात कॅब पार्क केले जातात.

सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी

वाहन             प्रवासी संख्या (दैनंदिन सरासरी)

- पीएमपी : १० लाख

- मेट्रो : १ लाख ७० हजार

- रिक्षा : २० लाख

- कॅब : ६ लाख

ओला, उबेर यांच्या गाड्यांना टुरिस्ट परमिट आहे. रिक्षांना काही प्रमाणात थांबे आहेत, परंतु कॅबचालकांना थांबा नाही. तसेच बाहेर शहरातील कॅबधारकांची संख्या पुण्यात वाढली आहे. कॅबचालकांना सिटी परमिट नसून, टुरिस्ट परमिट आहे. तरीही शहरात व्यवसाय करतात. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो.  - आबा बाबर, शिवनेरी रिक्षा संघटना

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड