शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी यंत्रणांच्या मदतीने देशातील लोकशाही संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र;रमेश चेन्नीथला यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:27 IST

- राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर न्यायाधीश त्यावर टिपणी करतात. सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले तर लगेचच त्याला देशद्रोही ठरवले जाते.

पुणे : सरकारी यंत्रणांच्या मदतीने देशातील लोकशाही संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा लढा देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आहे. हा लढा कठीण आहे. त्यासाठी आपण सगळेच राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व हा लढा जिंकू, असे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पक्षाने प्रदेश कार्यकारिणीसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चेन्नीथला म्हणाले, “राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर न्यायाधीश त्यावर टिपणी करतात. सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले तर लगेचच त्याला देशद्रोही ठरवले जाते. निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचे पुरावे दाखवून सांगितले तर त्याला उत्तर आयोग नाही, तर भाजपकडून दिले जाते. हे सगळे लोकशाही संपवण्याचेच प्रकार आहेत. त्याविरोधात समर्थपणे लढण्याची गरज आहे.”

देश कठीण स्थितीतून जात आहे, असे मत व्यक्त करून चेन्नीथला यांनी सांगितले की, एकाही शेजारी देशाशी आपले संबंध चांगले नाहीत. अमेरिका आपल्याला धमकी देत आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असे धाडस कोणीही केले नाही. पक्ष पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात मशाल मोर्चे काढावेत, नागरिकांमध्ये जा, पक्षाचे संघटन मजबूत करा, असे आवाहन चेन्नीथला यांनी केले.

दोन दिवसांची कार्यशाळा संपली. आता इथे जे काही मिळाले आहे ते थेट जनतेत जाऊन जनतेला समजावून सांगा. आपला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्षच आहे, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनीही तुम्ही आमची लढाई लढलात, आता आम्ही तुमची लढाई लढतो. स्थानिक स्वराज्य संस्था जोरात लढा, संपूर्ण पक्ष तुमच्याबरोबर आहे, असे सांगितले. पवन खेरा यांनी काँग्रेसने नेहमीच संविधान व लोकशाहीचा रस्ता निवडला आहे, भाजप हा फक्त खोटी वातावरणनिर्मिती करत आहे, अशी टीका केली. माजी मंत्री अमित देशमुख यांचेही भाषण झाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड