शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताऱ्यावरील नोंदी ऑनलाइन करण्यात आघाडी, जिल्ह्यात सव्वा लाख अर्ज, ९८ हजार मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:17 IST

भूमिअभिलेख विभागाने डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुणे : सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी ई-हक्क प्रणालीत घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येत आहे. याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या नऊ महिन्यांत १३ तालुक्यांतून १ लाख २१ हजार ८९९ नागरिकांनी विविध नोंदीसाठी अर्ज केले. यातील ९८ हजार २१५ अर्जांनुसार नोंदी मंजूर करण्यात आल्या आहेत.

भूमिअभिलेख विभागाने डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, अशी सरकारची भूमिका आहे.

त्यानुसार वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मृत व्यक्तीच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. हा ऑनलाइन अर्ज संबंधित गावातील महसूल अधिकाऱ्याकडे अर्थात तलाठ्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे.

याबाबत कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर म्हणाले, “जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तावरून उताऱ्यावर नोंद घेणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आदीच सातबारा उताऱ्यावरील बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे आदीसाठी ई-हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या कामांसाठी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २१ हजार ८९९ अर्जांपैकी ९८ हजार २१५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर उर्वरित सुमारे २२ हजार अर्ज अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकरण्यात आले असून, त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत १ हजार ६०४ नोंदी प्रलंबित असून, त्यासुद्धा लवकरच मंजूर होतील.”

या प्रक्रियेमध्ये नागरिक स्वतः अथवा महा ई-सेवा केंद्रातून देखील अर्ज करू शकतात. या प्रणालीच्या वापराने तलाठ्यांकडील फेरफार घेण्याचे कामकाज सुलभ होणार असून, महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता व पारदर्शकता येण्यास मदत होत आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा 

टॅग्स :PuneपुणेAgriculture Schemeकृषी योजनाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड