शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

धोकादायक ६१ पूल पाडणार;जिल्हा परिषद;सार्वजनिक बांधकाम विभागाला जितेंद्र डुडी यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:01 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे : जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ५८ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३, असे एकूण ६१ पूल धोकादायक असून, ते पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे या महत्त्वाच्या यंत्रणांनी अहवाल सादर केले आहेत. त्यात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यानंतर डुडी यांनी संबंधित यंत्रणांना हे धोकादायक पूल पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले असून, येत्या तीन महिन्यांत हे सर्व पूल पाडण्यात येणार आहेत.

याबाबत डुडी म्हणाले, ‘धोकादायक पूल पाडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. हे धोकादायक पूल कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी पाडण्यात येतील. या पुलांना पर्यायी व्यवस्था असून, त्याचा नागरिकांनी अवलंब करावा.’ या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. तर जखमींचा उपचाराचा पूर्ण खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. एका जखमीला दिल्ली येथे विशेष विमानानेही पाठविण्यात आल्याचे डुडी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची गर्दी करण्यासाठी बंदी घालण्याबाबत मतप्रवाह असून डुडी यांनी मात्र, बंदी घालणे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारी वनविभागासोबत सविस्तर बैठक झाली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळांवर संख्या मर्यादित करून ठरावीक ठिकाणापर्यंतच मुभा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

तसेच सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर पर्यटनस्थळांवर शुल्क आकारण्याचे ठरले आहे. त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभाग याचा आराखडा तयार करणार आहे. पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, समितीमार्फत पर्यटन मित्र तयार करण्यात येतील. येणाऱ्या शुल्कातून त्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी