शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक ६१ पूल पाडणार;जिल्हा परिषद;सार्वजनिक बांधकाम विभागाला जितेंद्र डुडी यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:01 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे : जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ५८ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३, असे एकूण ६१ पूल धोकादायक असून, ते पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे या महत्त्वाच्या यंत्रणांनी अहवाल सादर केले आहेत. त्यात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यानंतर डुडी यांनी संबंधित यंत्रणांना हे धोकादायक पूल पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले असून, येत्या तीन महिन्यांत हे सर्व पूल पाडण्यात येणार आहेत.

याबाबत डुडी म्हणाले, ‘धोकादायक पूल पाडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. हे धोकादायक पूल कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी पाडण्यात येतील. या पुलांना पर्यायी व्यवस्था असून, त्याचा नागरिकांनी अवलंब करावा.’ या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. तर जखमींचा उपचाराचा पूर्ण खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. एका जखमीला दिल्ली येथे विशेष विमानानेही पाठविण्यात आल्याचे डुडी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची गर्दी करण्यासाठी बंदी घालण्याबाबत मतप्रवाह असून डुडी यांनी मात्र, बंदी घालणे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारी वनविभागासोबत सविस्तर बैठक झाली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळांवर संख्या मर्यादित करून ठरावीक ठिकाणापर्यंतच मुभा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

तसेच सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर पर्यटनस्थळांवर शुल्क आकारण्याचे ठरले आहे. त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभाग याचा आराखडा तयार करणार आहे. पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, समितीमार्फत पर्यटन मित्र तयार करण्यात येतील. येणाऱ्या शुल्कातून त्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी