शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

धोकादायक ६१ पूल पाडणार;जिल्हा परिषद;सार्वजनिक बांधकाम विभागाला जितेंद्र डुडी यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:01 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे : जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ५८ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३, असे एकूण ६१ पूल धोकादायक असून, ते पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे या महत्त्वाच्या यंत्रणांनी अहवाल सादर केले आहेत. त्यात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यानंतर डुडी यांनी संबंधित यंत्रणांना हे धोकादायक पूल पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले असून, येत्या तीन महिन्यांत हे सर्व पूल पाडण्यात येणार आहेत.

याबाबत डुडी म्हणाले, ‘धोकादायक पूल पाडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. हे धोकादायक पूल कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी पाडण्यात येतील. या पुलांना पर्यायी व्यवस्था असून, त्याचा नागरिकांनी अवलंब करावा.’ या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. तर जखमींचा उपचाराचा पूर्ण खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. एका जखमीला दिल्ली येथे विशेष विमानानेही पाठविण्यात आल्याचे डुडी यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची गर्दी करण्यासाठी बंदी घालण्याबाबत मतप्रवाह असून डुडी यांनी मात्र, बंदी घालणे संयुक्तिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारी वनविभागासोबत सविस्तर बैठक झाली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळांवर संख्या मर्यादित करून ठरावीक ठिकाणापर्यंतच मुभा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

तसेच सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर पर्यटनस्थळांवर शुल्क आकारण्याचे ठरले आहे. त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभाग याचा आराखडा तयार करणार आहे. पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, समितीमार्फत पर्यटन मित्र तयार करण्यात येतील. येणाऱ्या शुल्कातून त्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी