शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेशोधासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:54 IST

- अन्न औषध विभागात ४०० निरीक्षकांची भरती

पुणे : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या गुन्ह्यांच्या शोधासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात लक्षणीय यश मिळेल असा विश्वास गृहराज्य व अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागात ४०० निरीक्षकांची भरती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात गुरूवारी दुपारी कदम यांचा वार्तालाप झाला. प्रास्तविकात कदम यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. राज्यमंत्री म्हणून मिळालेल्या अधिकारांमध्ये काम करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्ऱ्यांसह सर्व मंत्ऱ्यांचे आवश्यक ते सर्व सहकार्य मिळते असे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल विचारले असता कदम म्हणाले, “ गुन्ह्यांच्या या प्रकारात तंत्रज्ञान जास्त आहे. त्यामुळेच आता या प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यात हवालदारापासून ते वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंबईत एक संयुक्त केंद्रही तयार करण्यात येत आहे. फिर्याद दाखल झाली की मिनिटभरातच ती या केंद्रापर्यंत पोहचेल व त्यानंतर लगेचच तपासाची सुत्रेही हलतील. या केंद्रांचा देशात, देशाबाहेर अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सर्व केंद्रांबरोबर संपर्क असेल.”

सरकारमधील राज्यमंत्री त्यांच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्ऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे नाराज आहेत, त्यातही शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मंत्ऱ्यांना लक्ष्य केले असल्यासारख्या घटना घडत आहेत याकडे लक्ष वेधले असता कदम म्हणाले, “प्रत्येकच राज्यमंत्ऱ्यांला सुरूवातीच्या काळात संघर्ष करावाच लागतो. काही दिवसांनी दोघांचेही व्यवस्थित जमते. तसाच प्रकार आहे. काही ठिकाणी संघर्ष होतो मात्र ते स्वाभाविक आहे. नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे संघर्ष झाला तरी तो फार टिकत नाही.”

अन्न औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ नव्हते हे सत्य आहे. नागरिकांना जागृत करण्यासाठी म्हणून ज्या प्रसार व प्रचार मोहिमा कराव्या लागतात, त्यासाठी त्यांच्याकडे साधे बजेटही नव्हते. आता स्थिती बदलली आहे. ३९४ निरीक्षकांची या खात्यात भरती केली. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. या विभागाला बजेट मिळवून देण्यातही यश आले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या खात्याचे काम दिसू लागले असे कदम यांनी सांगितले. गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे हेही त्यांनी मान्य केले व त्याविरोधात मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली. संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील यांनी स्वागत केले. सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष सागर आव्हाड यांनी आभार व्यक्त केले.

ज्या बारचे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले तो बार आपण चालवत नव्हतो. तो काही माझा व्यवसाय नाही. जागा आमची होती, ती भाडेतत्वावर दिली होती व आम्ही भाडे स्विकारत होतो असे समर्थन कदम यांनी केले. सरकारमधील मंत्री सातत्याने वादग्रस्त होत आहेत हे खरे आहे, मात्र ती त्यात्या वेळची स्थिती असते, विरोधक त्याचे भांडवल करतात असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड