शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

रेशनचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, ग्राहकांना मोठा दिलासा

By नितीन चौधरी | Updated: May 7, 2025 15:34 IST

- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती

पुणे : राज्य सरकारने रेशनवरील धान्य वाटपासाठी पुढील महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतच उचलावे, असे सक्त निर्देश दिले होते. मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील मे महिन्याचे सुमारे ८ हजार टन धान्य उचलता आले नव्हते. परिणामी ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य उचलण्यासाठी १७ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुढील महिन्याच्या धान्यवाटपासाठी आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत धान्य उचलावे, असे आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले आहेत. धान्य उचलण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. या आदेशाचा फटका जिल्ह्यातील धान्यवाटपावर होण्याची शक्यता होती. जिल्ह्यात महिन्याला १४ हजार टन धान्य उचलावे लागते. त्यानुसार मे महिन्याचे धान्य ३० एप्रिलपर्यंत उचलावे लागणार होते. मात्र, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा न झाल्याने २८ एप्रिलपर्यंत केवळ ६ हजार टन धान्याची उचल झाली होती.

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार दोन दिवसांत ८ हजार टन धान्य उचलणे शक्य नव्हते. हे धान्य न उचलल्यास ग्राहकांना त्याचे वितरण करता येणार नव्हते. परिणामी अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी धान्य उचलण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने मे महिन्यातील भारतीय अन्य महामंडळाकडे धान्य उचलण्यासाठी ३ ते १७ मे अशी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

 याबाबत सुधळकर म्हणाले, “मे महिन्याचे अजूनही ६ हजार टन उचल झालेली नाही. या निर्णयामुळे १७ तारखेपर्यंत हे धान्य उचलता येणार आहे. त्याचप्रमाणे ३० मेपर्यंत जूनचे १४ हजार टन धान्यही उचलावे लागणार आहे. राज्य सरकारच्या मुदतवाढीमुळे ग्राहकांना वेळेत धान्य वितरण करता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के दुकानांमध्ये धान्य पोच झालेली आहे. त्या ग्राहकांना धान्य वाटपही सुरू झाले आहे.” 

जिल्ह्यातील सर्व धान्य कोरेगाव पार्क येथील गोदामातूनच द्यावे, अशी मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे केली होती. मात्र जूनचे धान्य फुरसुंगी गोदामातून उचलावे अशी सूचना महामंडळाने केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला फुरसुंगी येथील गोदामातून धान्य उचल करावी लागणार आहे. यात आणखी विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराला एक हजाराहून अधिक टन धान्य दररोज उचलावे लागणार आहे.  - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड