शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:59 IST

या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

घोडेगाव : ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाजासह चिखलाचा लोंढा गावावर धडकला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

दुर्घटनेनंतर शासनाने मयतांच्या वारसांना भरघोस मदत केली, तसेच विविध सामाजिक संस्थांनीही हातभार लावला. अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन पूर्ण झाले. नवीन माळीण गावात ६८ घरे बांधण्यात आली असून, सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावकरी आता स्थिरावले असून, शेतीसह इतर व्यवसायात गुंतले आहेत. काहींनी जनावरे पाळली, तर काहींनी गरजेनुसार शासनाने दिलेल्या घरांजवळ घरे वाढवली आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डिंभे धरण, आहुपेचे उंच कडे, भीमाशंकरचे जंगल आणि पाटण खोरे यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. माळीण आता पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास आले आहे. अनेक पर्यटक जुन्या माळीणच्या दुर्घटनास्थळाला आणि नवीन पुनर्वसित गावाला भेट देण्यासाठी येतात.

गावकरी टँकरवर अवलंबून

नवीन माळीणमध्ये सर्व सुखसोयी असल्या, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उन्हाळ्यात गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गावकरी विजय लेंभे म्हणाले, “पाणी योजना आणि बुब्रा नदीत बंधारा बांधूनही ठोस उपाय निघाला नाही. पाण्याचा प्रश्न सुटावा, ही आमची प्रमुख मागणी आहे.” 

नवीन गावात कमल लेंभे यांना घर मिळाले नाही. त्यांचे जुन्या माळीणमधील घर सामायिक होते आणि नवीन घराची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात झाली नव्हती. त्यांच्या दिराला घर मिळाले, पण कमल यांना शासनाने घरकुल मंजूर केले तरी जागेअभावी त्या अजूनही तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात - कमल लेंभे ग्रामस्थ 

स्मृतीस्तंभावर अभिवादन

३० जुलै २०२५ रोजी जुन्या माळीण येथील स्मृतीस्तंभावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहतील. गावकरी आपल्या जुन्या घरांच्या ठिकाणी नैवेद्यपूजा करणार आहेत. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने स्मृतीस्तंभावर शेड बांधण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी

कमाजी पोटे यांनी त्या भयंकर प्रसंगाची आठवण सांगितली, “रात्रभर पाऊस पडत होता. पाणी जमिनीत खोलवर मुरले, जमिनीचा श्वास गुदमरला आणि डोंगर खचला. दगड, झाडे, चिखलाचा लोंढा गावावर आला. माझे घर डोळ्यासमोर गाडले गेले. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.” अमोल अंकुश म्हणाले, “नवीन माळीण टुमदार वसले आहे. स्मृतीस्तंभावर शेड बांधले गेले, पण पाण्याचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड