शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

माळीण दुर्घटनेला ११ वर्षे; नवीन माळीण स्थिरावले, पाणी प्रश्न कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:59 IST

या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

घोडेगाव : ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. प्रचंड आवाजासह चिखलाचा लोंढा गावावर धडकला आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ जण मृत्युमुखी पडले. आता या दुर्घटनेला ११ वर्षे पूर्ण होत असताना, नवीन माळीण गावाने नवे रूप घेतले आहे, पण काही आव्हाने अजूनही कायम आहेत.

दुर्घटनेनंतर शासनाने मयतांच्या वारसांना भरघोस मदत केली, तसेच विविध सामाजिक संस्थांनीही हातभार लावला. अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन पूर्ण झाले. नवीन माळीण गावात ६८ घरे बांधण्यात आली असून, सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. गावकरी आता स्थिरावले असून, शेतीसह इतर व्यवसायात गुंतले आहेत. काहींनी जनावरे पाळली, तर काहींनी गरजेनुसार शासनाने दिलेल्या घरांजवळ घरे वाढवली आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात डिंभे धरण, आहुपेचे उंच कडे, भीमाशंकरचे जंगल आणि पाटण खोरे यांसारखी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. माळीण आता पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास आले आहे. अनेक पर्यटक जुन्या माळीणच्या दुर्घटनास्थळाला आणि नवीन पुनर्वसित गावाला भेट देण्यासाठी येतात.

गावकरी टँकरवर अवलंबून

नवीन माळीणमध्ये सर्व सुखसोयी असल्या, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उन्हाळ्यात गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गावकरी विजय लेंभे म्हणाले, “पाणी योजना आणि बुब्रा नदीत बंधारा बांधूनही ठोस उपाय निघाला नाही. पाण्याचा प्रश्न सुटावा, ही आमची प्रमुख मागणी आहे.” 

नवीन गावात कमल लेंभे यांना घर मिळाले नाही. त्यांचे जुन्या माळीणमधील घर सामायिक होते आणि नवीन घराची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात झाली नव्हती. त्यांच्या दिराला घर मिळाले, पण कमल यांना शासनाने घरकुल मंजूर केले तरी जागेअभावी त्या अजूनही तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात - कमल लेंभे ग्रामस्थ 

स्मृतीस्तंभावर अभिवादन

३० जुलै २०२५ रोजी जुन्या माळीण येथील स्मृतीस्तंभावर अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहतील. गावकरी आपल्या जुन्या घरांच्या ठिकाणी नैवेद्यपूजा करणार आहेत. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने स्मृतीस्तंभावर शेड बांधण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी

कमाजी पोटे यांनी त्या भयंकर प्रसंगाची आठवण सांगितली, “रात्रभर पाऊस पडत होता. पाणी जमिनीत खोलवर मुरले, जमिनीचा श्वास गुदमरला आणि डोंगर खचला. दगड, झाडे, चिखलाचा लोंढा गावावर आला. माझे घर डोळ्यासमोर गाडले गेले. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.” अमोल अंकुश म्हणाले, “नवीन माळीण टुमदार वसले आहे. स्मृतीस्तंभावर शेड बांधले गेले, पण पाण्याचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड