शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

VIDEO: ...तर मराठा आरक्षणासाठी पुणे-मुबंई लाँग मार्च- खा. संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 18:29 IST

संभाजीराजे म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारची भूमिका काय आहे. हे मी नेहमी आणि स्पष्टपणाने माझ्या भाषणात मांडली आहेत...

पिंपरी:मराठा आरक्षणाचा (maratha reservation) विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील. एक वर्षे लागेल. तोपर्यंत मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देण्याबाबत मी सरकारला सुचविले आहे. या मागणीबाबत काही निर्णय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरविले आहे. परत, सरकारला थोडा वेळ द्यायला लागलो आहे. जर त्यात काही निर्णय घेतला नाही. तर, आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईपर्यंत 'लाँग मार्च काढण्यात येईल, असे खासदार छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांनी सांगितले.

चिंचवड येथे  संभाजीराजे म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारची भूमिका काय आहे. हे मी नेहमी आणि स्पष्टपणाने माझ्या भाषणात मांडली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत राज्यसभेत जाहीरपणाने बोललो आहे. राज्य शासनाची जबाबदारी काय आहे हेही मी त्यांना सांगितले आहे. आरक्षणाचा विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील. एक वर्षे लागेल. पण, मागासवर्गीय आयोग स्थापन करुन किंबहूना आयोग स्थापन करता येत नसेल. तर, कमिटी स्थापन करायला पाहिजे. सर्व्हेक्षण करायला पाहिजे. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. ही राज्य शासनाची जबाबदारी आहे.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, हे काहीच होत नसेल तर केंद्रात आपण जाऊ शकतो. पण, आज केंद्राचा विषय नाही. त्याचबरोबर सरकार मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देऊ शकते. हे मी सांगितले आहे. या मागणीबाबत काही निर्णय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरविले आहे. परत, सरकारला थोडा वेळ द्यायला लागलो आहे. जर त्यात काही निर्णय घेतला नाही. तर, आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईपर्यंत 'लाँग मार्च काढण्यात येईल.''

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण