काेराेनाकाळातही पुणे- मुंबईमध्ये सर्वाधिक घरखरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:51+5:302021-04-11T04:11:51+5:30
पुणे : सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, वर्क फ्राॅम हाेमचे वाढते प्रमाण त्याचबराेबर बांधकाम व्यावसायिकांनी राबविलेल्या विविध याेजना यामुळे ...

काेराेनाकाळातही पुणे- मुंबईमध्ये सर्वाधिक घरखरेदी
पुणे : सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, वर्क फ्राॅम हाेमचे वाढते प्रमाण त्याचबराेबर बांधकाम व्यावसायिकांनी राबविलेल्या विविध याेजना यामुळे काेराेनाच्या काळातही घरखरेदीचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीतच देशात ५८,३०० घरांची विक्री झाली आहे. यामधील ५३ टक्के खरेदी ही केवळ पुणे, मुंबई आणि उपनगरांत झाली आहे.
कोरोनाच्या काळातही बांधकाम क्षेत्राने सकारात्मकतेकडे सीमोल्लंघन केले आहे. घर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने हे चित्र समोर आले आहे. देशातील बड्या सात शहरांचा विचार केला देशातील ५८,३०० घरांची या काळात विक्री झाली. मात्र यातील ५३ % वाट मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा आहे.
ॲॅनारॉक संस्थेने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. २०१९ मध्ये भारतातील ७ प्रमुख शहरात २,६१,००० घरांची विक्री झाली त्यात मुंबई व उपनगरे आणि पुण्याचा वाटा ४७ % होता. २०२० मध्ये तो १ ,३८,००० इतका असताना त्यात मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा वाटा ४९ टक्के झाला. मात्र २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ५८,३०० घरांची या काळात विक्री झाली मात्र यातील ५३ टक्के वाटा मुंबई व उपनगरे आणि पुणे यांचा आहे. पुण्यातील समतोल वातावरण, वाढते माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, शिक्षणाच्या अगणित आणि दर्जेदार संधी, सामन्यांच्या आजही आवाक्यात असलेले दर कोल्हापूर,सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक अशा शहरातून स्थलांतरित होताना ग्राहक पुण्याला झुकते माप आवर्जून देतात.
शासनाने घर खरेदीसाठी दिलेल्या कर सवलतीचा मोठा वाटा यामध्ये आहे. लॉकडाउनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांना घरामध्ये अतिरिक्त खोली असणे आवश्यक वाटत असल्याने अनेक गरजू ग्राहकांनी घरखरेदीची स्वप्नपूर्ती केली आहे.
-विनीत गोयल
सह - व्यवस्थापकीय संचालक, कोहिनुर ग्रुप
गृहकर्ज दर हे आजवरच्या तुलनेत नीचांकी आहेत. त्यामुळे वैयक्तिक ग्राहकाची गृहकर्ज घेण्याची मर्यादा वाढल्याने मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला आहे. मागील वर्षीपेक्षा सुद्धा जास्त गृहखरेदीची टक्केवारी वाढली आहे याशिवाय सरकारी कर सवलत हा गृह विक्री वाढण्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. शासनाला अशी विनंती आहे की यापुढेसुद्धा ही सवलत किमान ३ महिने मिळावी जेणे करून ग्राहक अधिकाधिक घर खरेदीकडे आकर्षित होईल.
- अमित परांजपे, हेड बिझनेस डेव्हलपमेंट
परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन