शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pune mumbai expressway वरुन दररोज '११ हजार वाहने' टोल न देता जातात बिनधास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:36 IST

टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे

पुणे : कोणतेही वाहन टोल न देता जाऊ नये, अशी कडक व्यवस्था असतानाही पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरुन दररोज तब्बल ११ हजार वाहने टोल न देता बिनधास्त जात असल्याचा दावा टोल वसुल करणार्‍या कंपनीने केला आहे. या टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोलनाक्यांवरुन रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात. ती संख्या व टोलची रक्कम यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या आकडेवारीत या महामार्गावरुन दररोज ११ हजार वाहने टोल न देता जात असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 

डिसेंबर २०२१ या संपूर्ण महिन्यात ३ लाख ३० हजार ७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरुन प्रवास केला आहे. त्यात सवलत आणि नियमभंग अशा दोन गटामधील वाहने असल्याचे म्हटले आहे. त्यात सवलतीची वाहने किती आणि नियमभंग करुन टोल न भरता गेलेली वाहने किती याचा वेगळा तपशील जाणीवपूर्वक देण्यात आलेला नाही.

फक्त या वाहनांना सवलत 

रुग्णवाहिका, पोलीस, मिलिटरी वाहने, आमदार, खासदार, न्यायाधीश अशांच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात महामार्गावरुन १८५० बसेस, ५१९३ ट्रक, ५०८६ मल्टी एॅक्सल, २० हजार १९६ एलसीव्ही ही वाहने टोल न भरता निघून गेल्याचे दाखविण्यात आले आहे. या महामार्गावरुन प्रवास करणार्‍या कोणीही सांगू शकेल की येथील टोलनाका चुकवून कोणीही जाऊ शकत नाही. असे असताना ३ लाख ३० हजार वाहने टोल न भरता गेली, हे सर्व संशयास्पद वाटते. कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील अधिकार्‍यांना यात काहीही वावगे वाटत नाही हे आश्चर्यकारक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेलणकर यांनी पत्र लिहिले असून त्यात यापुढे सवलतीची वाहने आणि नियमभंग करुन गेलेली वाहने या दोन्ही गटाची आकडेवारी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्याचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत़ तसेच टोल चुकवून जाण्याचा हा सर्व प्रकार संशयास्पद असून त्याला जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक