शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Express Way | 'एक्स्प्रेस वे'ची टोलधाड! जनहित याचिका पाच वर्षांपासून प्रलंबित; ५ एप्रिलला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:16 IST

येत्या ५ एप्रिल रोजी या जनहित याचिकेची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे...

- विवेक भुसे

पुणे :पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील कंत्राटदाराने खर्च केलेली रक्कम वसूल झाली असून, यावरील टोल रद्द करावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर अनेकदा सुनावणीही झाली असली, तरी अद्याप ती प्रलंबित आहे. येत्या ५ एप्रिल रोजी या जनहित याचिकेची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर, विवेक वेलणकर, संजय शिरोडकर आणि श्रीनिवास घाणेकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. तसेच अनेक अटींचे पालन कंत्राटदार कंपनीने केले नसल्याने त्यांचा करार रद्द करून टोल बंद करावा, अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. परंतु, तेथेही दाद न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली़.

याबाबत याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सांगितले की, आमच्या याचिकेमध्ये आम्ही २००२ मध्ये केलेल्या अधिसूचनेमधील दर ३ वर्षांनी टोलमध्ये वाढ करण्याची अट रद्द करावी व टोल रद्द करावा. किमानपक्षी चारचाकी वाहनांवरील टोल अशी मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचा आदेश २०१८ मध्ये दिला होता. राज्य सरकारने टोल रद्द केला तर सरकारला भुर्दंड पडेल. त्यामुळे टोलमाफी देता येणार नाही. तसेच यावरील वाहतुकीत १० टक्क्यांपेक्षा कमी तफावत असल्याचे उत्तर दिले होते. त्यावर आम्ही आमचे म्हणणे मांडले की, वाहनांच्या संख्येविषयी नाही तर कंत्राटदार कंपनी या महामार्गावरून दररोज १० ते १२ हजार वाहने टोल न भरता जातात, असे दाखविले जाते. हे चुकीचे असून हा मोठा घोटाळा आहे. त्यातून काळा पैसा निर्माण होत असल्याचे दाखवून दिले आहे. मधल्या काळात यावर सुनावणी झाली नाही. आता ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईtollplazaटोलनाका