शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या निवडणुकीसाठी पुणेकरांची मेट्रो पळवली; युवक काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:07 IST

वास्तविक पुणे शहरात मेट्रो ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज १ ते दीड लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळेच मेट्रो मार्ग विस्तार होणार असल्याने गाड्यांची वारंवारिता वाढवण्याची गरज आहे.

पुणे: बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पाटणा येथे मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांची तयार असलेली मेट्रो पाटण्याला पळवण्यात आली असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसने केला. तीन डब्यांची ही मेट्रो त्वरीत परत आणावी अन्यथा महामेट्रो कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला बिहारची विधानसभा निवडणुक जिंकायचीच आहे. तेथील मतदारांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. पाटणा येथे मेट्रोचे काम सुरू आहे. चाचणी घेण्यासाठी म्हणूनही त्यांच्याकडे मेट्रो नाही. पुण्यात महामेट्रो कंपनीची एक राखीव मेट्रो होती. राजकीय दबाव टाकून केंद्र सरकारने ही मेट्रो ३ वर्षांसाठी म्हणून पाटणा मेट्रो ला द्यायला लावली. हा एकूण प्रकारच पुणेकर मेट्रो प्रवाशांवर अन्याय करणारा आहे.

वास्तविक पुणे शहरात मेट्रो ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज १ ते दीड लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळेच मेट्रो मार्ग विस्तार होणार असल्याने गाड्यांची वारंवारिता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी म्हणून महामेट्रोने राखीव संच ठेवले आहेत. त्यातीलच एक संच बिहारला पाठवण्यासाठी केंद्र सरकारने महामेट्रो कंपनीवर दबाव आणला असे आबनावे म्हणाले.

हे करताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही अशीही टीका आबनावे यांनी केली. निवडणुकीपूर्वी मेट्रो सेवेचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकासावर हा घालाच घातला आहे असे ते म्हणाले. ही ट्रेन परत पुण्याला मागवून घ्यावी, अन्यथा महामेट्रोच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा आबनावे यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड